Professional Documents
Culture Documents
STD 5 TH Science Bridge Course
STD 5 TH Science Bridge Course
STD 5 TH Science Bridge Course
1 प्राण्यांचा जीवनक्रम
3 साठवण पाण्याची
4 पिण्याचे पाणी
5 घरोघरी पाणी
6 अन्नातील विविधता
7 आहाराची पौष्टिकता
8 मोलाचे अन्न
9 हवा
10 वस्र
13 दिशा व नकाशा
16 दिवस व रात्र
17 माझी जडणघडण
21 समूहजीवनासाठी व्यवस्थापन
22 वाहतूक व संदेशवहन
23 नैसर्गि क आपत्ती
वरील चित्र निरीक्षणातून लक्षात येते की, कु त्र्याची पिल्ले आणि त्यांची आई यांच्यामध्ये साम्य दिसते.
फु लपाखरू आणि अंड्यातून बाहेर पडलेली फु लपाखराची अळी ह्यात साम्य दिसत नाही तर खूप वेगळेपण असते. पिल्लू
आणि पूर्ण वाढ झालेला प्राणी यांचा रूपांत लक्षात घेण्याजोगी तफावत असणे, याला रूपांतरण म्हणतात.
कोंबडी अंडी घालते, त्यातून पिल्लू बाहेर येते, तर मांजरीचे पिल्लू अंड्यातून बाहेर येत नाही. यावरून काही
प्राणी अंडी घालतात, तर काही प्राणी आईच्या पोटातून जन्म घेतात, अन आपल्यासारखा दुसरा जीव जन्मास घालणे
म्हणजेच ‘प्रजनन’ होय.
मांजरीचे पिल्लू आईच्या पोटातून जन्म घेते. तर कावळा, कोळी, सरडा हे प्राणी अंडी घालतात, तसेच मुंग्या,
फु लपाखरे, मासे, बेडू क, साप हे प्राणीही अंडी घालतात, पण ही अंडी सहसा आपल्या पाहण्यात येत नाहीत. काही
प्राणी खूप चिं टूकले असतात. त्यांची अंडी सहजासहजी दिसत नाहीत. पण ह्या अंड्यातून पिल्ले जन्मास येतात आणि
त्यांची वाढ होते, म्हणजे प्रजनन होते. उदाहरणार्थ : कोंबडीच्या पिल्लांचा अंड्यातून जन्म (प्रजनन)
कोंबडीचे अंडे दिसू शके ल इतपत मोठे असते. ती अंडी घालते,
अंड्यामध्ये पिल्लाची वाढ होण्यासाठी ती अंडी उबवते. मग पिल्ले हळू हळू
वाढतात. वाढ पूर्ण होताच पिल्लू अंड्याचे कवच फोडू न बाहेर येते, हे झाले
कोंबडीचे प्रजनन.
सराव करू या :
प्र. 1) चित्र पहा, चित्रात कोणती कृ ती दिसते, तुमच्या शब्दात लिहा.
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
-----------------------------------------------------
प्र.2) चित्रात पहा, मांजरीचे पिल्लू आणि मांजर यांच्यात सारखेपणा आहे, अशा सारखेपणा असलेल्या प्राणी-पिल्लू
यांच्या जोड्या लिहा. (उदा. मांजर-मांजरीचे पिल्लू)
----------------------------------------------------------
----------------------------------------------------------
----------------------------------------------------------
----------------------------------------------------------
प्र. 4) तुमच्या परिसरात आढळणार्या अंडी देणार्या प्राण्यांचे निरीक्षण करून यादी तयार करा.
--------------------------------------------------------------------------------
-----------------------------------------------------------------
प्र. 5) अंड्यातून जन्म घेणारे व आईच्या पोटातून जन्म घेणारे प्राणी यांची यादी करा. पुढील तक्त्यात लिहा.
------------------------------------- -------------------------------------
------------------------------------- -------------------------------------
------------------------------------- -------------------------------------
------------------------------------- -------------------------------------
अन्न, पाणी, हवा, वस्त्र, निवारा ह्या आपल्या मूलभूत गरजा आहेत. वरील चित्रांच्या निरीक्षणातून तुम्ही त्या
ओळखल्या असतील. परिसरातूनच या गरजा पूर्ण होतात. आपल्या अशा अनेक गरजा आहेत, आणि ह्या गरजा सर्वच
सजीवांच्या आहेत. पण प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजांमध्ये फरक असतो. उदा. उंदीर आणि हत्तीला लागणारे
पाणी यात फरक असतोच. प्रत्येक प्रकारच्या सजीवांच्या गरजा जिथे पूर्ण होतील, तिथेच ते सजीव आढळतात. वाघाचेच
पहा ना ! वाघ गवतात दबा धरून, तर कधी घनदाट झाडी, उंच गवत, गुहा येथे आडोसा घेतो. तर तो पोट भरण्यासाठी
हरणे, नीलगाई, गवे ह्यांच्या शिकारी करतो.
दुसरीकडे माणूस आपल्या गरजा पूर्ण होण्यासाठी विविध प्राणी पाळतो. त्याचा उपयोग दूधदुभते, मांस, अंडी
यांसाठी करतो. तर काही प्राणी ओझी व कष्टाच्या कामासाठी उपयुक्त असतात. कु त्रा घराची राखण करतो, तर मेंढी
लोकर देते. अशीच माणसाला वनस्पतींची सुद्धा गरज लागते. उदा. अन्नधान्य, भाजी, फळफळावळ. त्यानुसार प्राणी
आणि वनस्पतींची काळजी मानव प्रेमाने घेत असतो, कारण प्राणी-वनस्पती आपणास भरभरून देतात.आपल्या गरजा
पूर्ण करतात.
ऋतुमानातील बदलांचा सजीवांवर परिणाम : मुलांनो, तुम्हास ऋतू माहिती आहेतच, ह्या ऋतूंचा सजीवांवर
परिणाम होत असतो! खालील चित्र पाहिल्यास तुमच्या लक्षात येईल.
वरील चित्रात काय दिसते? तुम्हास काय वाटते? तर उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे आपले ऋतू आहेत. ह्या
ऋतुंच्या बदलाचा परिणाम सजीवांवर होतो. उन्हाळ्यात उकडते म्हणून सुती कपडे, पावसाळ्यात छत्री, इरले, रेनकोट तर
हिवाळ्यात उबदार कपडे लागतात. माणसावर तिन्ही ऋतूंचा परिणाम होतो, तसा इतर सजीवांवरही होतो. हिवाळ्यात
पाने गळू न पडतात, तर आंब्याला फु लोरा येतो, काही प्राण्यांच्या अंगावरील के स दाट होतात. मार्च महिन्यात उष्णता
लागते, अनेक झाडांना पालवी फु टते, कोकीळ मंजुळ आवाज करतो. आंबे, फणस, काजू यांचा हंगाम येतो. तर जूनमध्ये
काळे ढग आणि पावसाला सुरुवात होते, या पावसामुळे गवत आणि वनस्पती वाढतात. त्यात कधी संध्याकाळी
सप्तरंगी इंद्रधनुष्य दिसते. आजूबाजूला बेडू क डराव-डराव करतात, शेती बहरते. परिसर हिरवा होतो. हे सर्व परिणाम
ऋतुमानातील बदलाने होतात.
प्र. 1) खालील वाक्यात आपली कोणती गरज लक्षात येते ते वाक्यासमोर लिहा.
---------------------------
---------------------------
---------------------------
---------------------------
---------------------------
---------------------------
अ) मुंगी आणि हत्ती ह्यांच्या अन्न व पाण्याच्या गरजेत फरक आहे, असा फरक कोणकोणत्या सजीवांत असेल अशा तीन
जोड्या विचार करून लिहा.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
ब) ऋतुमानाप्रमाणे सजीवसृष्टीत काही बदल होतात. उदा. हिवाळा - झाडांची पाने गळू न पडतात. असे काही बदल तुम्ही
अनुभवले असतील, ते पुढील ऋतूसमोर लिहा.
1) पावसाळा -------------------------------------------------------
2) हिवाळा -------------------------------------------------------
3) उन्हाळा -------------------------------------------------------
प्र. 4) रीनाला हिवाळ्यात शिबिरासाठी जायचे आहे. तिला थंडीचा त्रास होऊ नये, यासाठी तिला कोणत्या सूचना द्याल?
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
1)https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm
_source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_312486441141
77228823951
सजीवांच्या गरजा
2)https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=d
o_313292496148471808138752
कृ तिपत्रिका : 03
समजून घेऊया : पाण्याचे पारंपारिक स्रोत व नवीन स्रोत
संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण 03, साठवण पाण्याची
अध्ययन निष्पत्ती : स्रोतापासून ते घरापर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मि ती आणि प्राप्तीची प्रक्रिया विशद करतात.
(उदा. अन्न, पाणी, वस्त्र)
लक्षात घेऊया :
तुम्हास माहीत असेल, पावसापासून मिळणारे काही पाणी जमिनीवरून वाहून जाते. काही जमिनीत मुरते.
वर्षभर हे पाणी सर्व सजीव वापरतात. पाणी साठवून ठेवले नाही तर सर्वाना पुरेसे पाणी मिळणार नाही. त्यासाठी ते
साठवावे व काटकसरीने वापरावे. ह्यासाठी पाणी साठवण्याच्या विविध पद्धती आहेत. त्यात पारंपरिक व नवीन स्त्रोत
(जलसाठे, व्यवस्था) आहेत. खालील चित्रांचे निरीक्षण के ल्यावर आपणास पारंपरिक जलसाठे लक्षात येतील. असे
साठे तुमच्या परिसरात असल्यास निरीक्षण करा. त्याबद्दल माहिती मिळवा.
पारंपरिक स्त्रोत (जुने जलसाठे) - खालील चित्राचे निरीक्षण के ल्यास आपल्याला पाण्याचे पारंपारिक/जुने जलसाठे
लक्षात येतील.
आपल्या राज्यात जुन्या काळी पाणी साठवण्याच्या अनेक पद्धती होत्या, आता त्या वापरात नाहीत. त्याचे
अवशेष दिसतात. काही जलसाठ्यामधील पाणी कधीच आटत नाही. ह्यामध्ये विहीर, आड, नदी, तलाव इ. समावेश
होतो.
2) किल्ल्यावरील तलाव व टाक्या - पूर्वी किल्ल्यावरील लोकांना पाण्यासाठी तलाव व दगडात खणलेली पाण्याची
टाकी असायची.
3) आड - पूर्वी पाणी मिळवण्यासाठी आड खणले जायचे, त्याचा घेर कमी असतो व त्यात दोरीला बांधलेले भांडे
(पोहरा) टाकू न पाणी काढले जायचे. सांगली जिल्ह्यात आटपाडी येथे पूर्वी प्रत्येक वाड्यात आड होते.
4) नदी व बंधारा - नदीचे पाणी अडवण्यासाठी दगड, मातीचे बांध/बंधारे बांधले जात.
6) जुने हौद - पाणी साठवण्यासाठी जुन्या काळात मोठ्या शहरांमध्ये हौद असायचे, असे हौद आजही वापरात आहेत.
नवीन स्त्रोत (नव्या व्यवस्था) - खालील चित्रात नवीन जलसाठे दिसत आहेत, तुम्ही तुमच्या परिसरात असे जलसाठे
पाहिले आहेत का? आपणास हे जलसाठे कसे उपयुक्त आहेत, ते लक्षात घ्या.
1) धरण - खूप जास्त पाणी साठवता येते. जास्त पाणी साठवल्यामुळे शेती पिकवता आली, शहरे वाढली, कारखाने उभे
झाले, वीजनिर्मि ती करणे शक्य झाले.
2) विं धन विहीर - विजेचा वापर सुरु झाल्याने पंपाद्वारे खूप खोलवरचे पाणी उपसण्यासाठी विं धन विहिरी (बोअर वेल)
खणल्या गेल्या. या खूप खोल असून त्याचा घेर मात्र लहान असतो.
3) पाणपोई - घराबाहेर किं वा प्रवासात असलेल्या लोकांना पिण्यासाठी पाणी लागते, त्यासाठी रांजण/माठ पाण्याने
भरून पाणी पिण्याची सोय के ली जाते, ती पाणपोई होय. काही व्यक्ती किं वा संस्था अशा पाणपोई सुरु करतात. त्यामुळे
लोकांची पिण्याच्या पाण्याची सोय होते. उन्हाळ्यात पाणपोईचा खूप वापर होतो.
पाणी ही नैसर्गि क संपत्ती आहे, तिचा वापर सर्वच सजीव करतात. पाणी हे जीवन आहे, याचे भान ठेऊन
पाण्याच्या स्त्रोतांचा वापर करावा.
प्र. 1) पाणी व पाण्याचे जलसाठे वापराबाबत खालीलपैकी योग्य सवयीपुढे ✔ अशी खूण करा.
प्र.3) तुमच्या घरी पाणी कसे येते? त्या पाण्याचा घरापर्यंतचा प्रवास पालकांशी चर्चा करून लिहा.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र.4) पाण्याचा वापर काटकसरीने / जपून करण्यासाठी कोणत्या चांगल्या सवयी तुम्ही लावून घ्याल?
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र.5) खालील चित्र पहा. असा पाण्याचा स्त्रोत आपणास कोठे पहायला मिळतो? त्याचा उपयोग तुमच्या शब्दात
लिहा.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
द्रावण : पाण्यात एखादा पदार्थ विरघळला, की पाणी व त्या पदार्थाचे मिश्रण तयार होते. या मिश्रणाला पदार्थाचे द्रावण
म्हणतात.
निर्धोक पाणी : जे पाणी प्यायले असता, आपल्या प्रकृ तीला कोणत्याही प्रकारे धोका होत नाही, अशा पाण्याला निर्धोक
पाणी म्हणतात. पिण्याचे पाणी निर्धोक असायला हवे.
पावसाळ्यातील गढू ळ पाणी आपण निवळू न घेतो. गरज असेल तर त्यात तुरटी फिरवतो किं वा गाळू न घेतो.
यामुळे पाण्याचा गढू ळपणा कमी होतो. पाणी स्वच्छ व पारदर्शक दिसू लागते. म्हणजे ते निर्धोक झाले का? याविषयी
आपण अधिक माहिती घेऊ.
पिण्याचे पाणी निर्धोक असायला हवे. शुद्ध पाण्याला चव नसते, रंग नसतो किं वा वास नसतो. पाण्याला रंग
दिसू लागला किं वा दुर्गंधी येऊ लागली, तर ते पाणी पिऊ नये.
असे पाणी प्यायल्याने माणसे आजारी पडू शकतात. आपल्या सभोवताली अनेक प्रकारचे सूक्ष्मजीव असतात.
अपायकारक सूक्ष्मजीव पाण्यात असले तरी डोळ्यांना दिसत नाहीत. असे सूक्ष्मजीव असणारे पाणी पारदर्शक असले तरी
पिण्यायोग्य म्हणजेच निर्धोक असेल का ?
पावसाळ्यामध्ये बऱ्याच वेळा हगवण किं वा गॅस्ट्रो सारख्या रोगांची साथ येते. अशा वेळी पाणी निर्धोक
करण्यासाठी निवळू न आणि गाळू न घेतलेले पाणी उकळू न घ्यावे लागते. पाणी उकळल्याने पाण्यातील सूक्ष्मजीव मरतात
आणि आजार होण्याचा धोका टळतो.
प्र. 1) पाणी पारदर्शक दिसत असले तरी ते पिण्यायोग्य असेलच असे नाही, याचे कारण काय?
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
आ) रवा आणि साबुदाणा एकत्र झाले आहेत ते वेगळे करायचे आहेत. कसे कराल?
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र. 3) पावसाळ्यात नळाला पिण्याचे पाणी गढू ळ आले तर ते पिण्यायोग्य कसे कराल?
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र. 4) खालील वस्तूंचे वर्गीकरण करा व तक्ता पूर्ण करा. (दगड, साखर, लाकू ड, पेन, खिळा, मीठ, तेल)
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
अधिक अभ्यासासाठी लिं क्स :
1) पदार्थाचे द्रावण
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292496548265984138765
2) निर्धोक पाणी
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292496608952320138767
कृ तिपत्रिका : 05
समजून घेऊया : पाण्याची साठवण, पाणी वितरण व्यवस्था
संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण 5, घरोघरी पाणी
अध्ययन निष्पत्ती: स्रोतापासून ते घरापर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मि ती आणि प्राप्तीची प्रक्रिया विशद करतात.
(उदा. अन्न, पाणी, निवारा)
लक्षात घेऊया :
खालील चित्रात काही पाणी साठवण्याची भांडी दाखवली आहेत, त्यांची नावे ओळखा पाहू.
आपल्याला सतत पाण्याची गरज पडत असते. गरजेनुसार पाणी घेता यावे म्हणून ते घरात साठवून ठेवावे
लागते. स्वयंपाकाच्या पाण्याची भांडी आपण झाकू न ठेवतो. यामुळे पाण्यात धूळ व कचरा पडत नाही. आपण पाणी
घेण्यासाठी लांब दांड्याचे ओगराळे वापरतो. पाणी काढू न लगेच झाकण ठेवतो. पण या भांड्यांना तोटी लावणे ही पाणी
काढण्याची सर्वात उत्तम पद्धत आहे.
पाणी शिळे होत नाही - आधीच्या दिवशी घरात भरुन ठेवलेले पिण्याचे पाणी काहीजण ओतून देतात आणि
दुसरे पाणी भरतात. त्यांना वाटते, पाणी शिळे होते. पण ही समजूत चुकीची आहे. पाणी ओतून देणे म्हणजे चांगले पाणी
वाया घालवणे. पाणी खराब झाले असले तरच त्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर कामासाठी करावा. मोठ्या प्रमाणात
पाण्याचे शुद्धीकरण आणि वितरण कसे होते ते पाहूया, यासाठी खालील आकृ तीचे निरीक्षण करा.
सर्वच स्रोतांमधील पाणी जसेच्या तसे पिण्यासाठी वापरता येईल याची खात्री देता येत नाही. म्हणून
गावाजवळचा एखादा मोठा पाण्याचा स्रोत पाहतात. कालवा किं वा मोठ्या जलवाहिनीच्या मदतीने संपूर्ण गावासाठी
एका ठिकाणी पाणी आणतात. तेथे ते पिण्यासाठी निर्धोक करतात. याला जलशुद्धीकरण म्हणतात. जलशुध्दीकरण
कें द्रातून ते सर्वांना पुरवण्याची सोय करतात. याला जलवितरण म्हणतात. आजही काही वस्त्यांमध्ये विहिरी मधून किं वा
कु पनलिकांमधून पाणी काढतात. पण ते निर्धोक असल्याची खात्री करून घ्यावी लागते. विहिरीचे पाणी निर्धोक नसेल,
तर पिण्यासाठी पाणी उकळू न घ्यावे. आरोग्याला धोका राहणार नाही याची खात्री करुन घ्यावी. काही ठिकाणी
टँकरमधून वाहतूक करुन वस्त्यांना पाणी पुरवतात.
सराव करू या :
इ) नळाला पाणी आले म्हणून सई भरलेला हंडा ओतून देऊन पुन्हा पाणी भरायला गेली. ----------------
प्र.3) रोज लागणारे पाणी नदीवरून प्रत्येक कु टुंबाला आणावे लागत असेल तर त्यांना -
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र.5) पाणी वाचवा हा संदेश देणारी दोन घोषवाक्ये लिहा. (उदा.बचत पाण्याची, गरज काळाची)
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र.6) तुमच्या घरी पाणी ज्या स्रोतातून येते त्या स्रोताचे चित्र काढा .
1) पाण्याची साठवण
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292496668418048138769
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
31248644118458368023952
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292496755007488138772
कृ तिपत्रिका : 06
समजून घेऊया : खाद्यान्न पिके व त्यातील प्रदेशानुसार विविधता
संदर्भ : इयत्ता- चौथी, प्रकरण 6, अन्नातील विविधता
अध्ययन निष्पत्ती: जिल्हे व राज्यानुसार खाद्यान्न पिके , प्रसिद्ध खाद्यपदार्थ व प्रदेशानुसार त्याची विविधता
असण्यामागील कारणे समजून घेऊन नकाशात दाखवितात.
लक्षात घेऊया :
आपल्या देशात शेती हा व्यवसाय के ला जातो. ही शेती मुख्यतः पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे.पाऊस
सर्वत्र सारखा पडत नाही, तो कमी-जास्त पडतो. जास्त पावसाच्या प्रदेशामध्ये तांदूळ (भात), नारळ, नाचणी, वरई अशी
पिके घेतात. मध्यम पावसाच्या प्रदेशात गहू, तूर, सोयाबीन ही पिके घेतली जातात. कमी पावसाच्या प्रदेशात ज्वारी,
बाजरी, मटकी अशी पिके घेतली जातात. पिक चांगले यावे यासाठी चांगली बियाणे, सुपीक जमीन, पुरेसा सूर्यप्रकाश
आणि आवश्यक तेवढे पाणी याची गरज असते. आपल्या देशात ऋतूनुसार अन्नधान्य व भाजीपाला, फळे यात विविधता
दिसून येते.
उदा-.खालील चित्रे पहा व पिकांची नावे ओळखा.
कोणत्याही प्रदेशात पिकणाऱ्या मुख्य पिकाचा उपयोग त्या प्रदेशात विविध पदार्थ बनवण्यासाठी के ला जातो.
उदा. महाराष्ट्राच्या पठारी भागात ज्वारी जास्त प्रमाणात होते; याभागात ज्वारीपासून हुरडा, लाह्या, भाकरी, पापड, धपाटे,
धिरडे इत्यादी पदार्थ बनवले जातात. कोकणात किं वा समुद्रकिनाऱ्या लगतच्या प्रदेशात तांदूळ, नारळ व खोबरेल तेलाचा
वापर मोठ्या प्रमाणात के ला जातो. महाराष्ट्रात ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, तीळ व मोहरी इत्यादींचा वापर मोठया
प्रमाणावर करतात. मृदा व हवामानानुसार पिकांमध्ये हा बदल होतो हे लक्षात घ्या. या बदलांनुसार त्या प्रदेशातील
लोकांचा आहार ठरतो.
प्र.1) पुढील चित्रे पहा व महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात हे पदार्थ प्रामुख्याने बनवले जातात ते त्या चित्राच्या खाली
लिहा.
प्र.2) खाली दिलेल्या पिकांपासून घरी बनविल्या जाणाऱ्या दोन पदार्थांची नावे लिहा.
अ) गहू -------------------------------------
आ) नारळ -------------------------------------
इ) मका -------------------------------------
ई) तांदूळ --------------------------------------
प्र. 3) डोसा बनवण्यासाठी कोणकोणते पदार्थ लागतात त्यांची नावे लिहा व आईच्या मदतीने घरी डोसा बनवून पहा.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------
अन्नातील विविधता
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
31248628645400576023745
अन्नातील विविधता-2
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
31309584837097062411041
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292496984260608138780
कृ तिपत्रिका :07
समजून घेऊया : अन्नपदार्थातील विविधता, अन्नपदार्थाची पौष्टिकता
संदर्भ : इयत्ता चौथी प्रकरण ७, आहाराची पौष्टिकता
अध्ययन निष्पत्ती : स्रोतापासून ते घरापर्यंत जीवनावश्यक वस्तूंच्या निर्मि ती आणि प्राप्तीची प्रक्रिया विशद करतात.
(उदा. अन्न, पाणी, वस्त्र)
लक्षात घेऊया :
अन्नपदार्थातील विविधता - खालील चित्र पहा आणि त्यात तुम्हाला काय दिसते त्याचे निरीक्षण करा, आणि
चित्रात जे अन्नपदार्थ आहेत त्यांची यादी करा.
आपल्या आहारात आपण काही अन्नपदार्थ कच्चेच खातो आणि काही अन्नपदार्थ प्रक्रिया करून खातो. म्हणजेच
काही पदार्थापासून विविध नवीन पदार्थ तयार के ले जातात. उदा. दुधापासून लोणी, दही, ताक, श्रीखंड, लस्सी तयार
के ले जातात. भाकरी तयार करण्यासाठी ज्वारी आणि बाजरीचे पीठ वापरतो. गोड पदार्थ करताना उसापासून मिळणारी
साखर किं वा गूळ वापरतो. यावरून असे स्पष्ट होते की, आपण जे अन्न पदार्थ वापरतो त्यात खूप विविधता दिसून येते.
अन्नपदार्थाची पौष्टिकता - अन्नपदार्थांमध्ये जशी विविधता असते, तसे लोकांची आवडनिवड ही वेगळी असते. म्हणून
शरीराच्या अन्नविषयक गरजा पूर्ण होण्यासाठी आपल्या आहारात सर्वच अन्नपदार्थ थोड्या फार प्रमाणात असणे
आवश्यक असते. सर्वच अन्नपदार्थ आपल्या आहारात असल्याचे काही फायदे असतात, ते खालीलप्रमाणे,
1. काही अन्नघटकांपासून आपल्या शरीराला ताकद मिळते.
2. काही अन्नघटकांमुळे शरीराची वाढ होते.
3. काही अन्नघटकांमुळे शरीर धष्टपुष्ट बनते.
4. काही अन्नघटकामुळे आजाराविरुद्ध लढण्याची शक्ती मिळते आणि हाडेही मजबूत होतात.
5. शरीराची सर्व कामे नीट होण्यासाठी शरीरात पाण्याचीही गरज असते.
यावरून असे स्पष्ट होते की, आपल्या शरीराचे काम व्यवस्थित चालायचे असेल तर शरीर धडधाकट राहायला
हवे म्हणून सगळेच अन्नघटक आपल्या आहारात असायला हवेत. खाद्यपदार्थ तयार करताना अनेक उपयुक्त ठरणारे
अन्नघटक नष्ट होऊ शकतात असे होऊ नये म्हणून अन्नपदार्थाची पौष्टिकता टिकवण्यासाठी आपण काही काळजी घेतली
पाहिजे.
जसे, अन्न शिजवताना त्यात आवश्यक तेवढेच पाणी घ्यावे. प्रेशर कु करचा वापर करावा. कडधान्याचे मोड
लहान असेपर्यंत आपल्या आहारात वापरावे. पीठातील कोंडा काढू न टाकू नये. फळे सालीसकट खावीत.
सराव करू या :
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र. 2) आपल्या आहारात जे अन्नपदार्थ आपण कच्चेच खातो त्यांची खाली दिलेल्या रिकाम्या जागेत चित्रे काढा.
(जसे, गाजर, मुळा, काकडी, सफरचंद, आंबा, टोमॅटो)
प्र. 3) खाली दिलेल्या चित्रांचे निरीक्षण करा आणि त्यातील आपल्या शरीराला पौष्टिक असलेल्या आणि पौष्टिक
नसलेल्या अन्नपदार्थाची यादी करा.
1) अन्नपदार्थाची पौष्टिकता
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
31248642063272345613873
2) आहारातील अन्नघटक
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292497082048512138784
कृ तिपत्रिका : 08
समजून घेऊया : शेतीतील कामे, अन्नाची नासाडी टाळणे.
संदर्भ : इयत्ता चौथी प्रकरण ८, मोलाचे अन्न
अध्ययन निष्पत्ती : स्रोतापासून ते घरापर्यंत जीवनाश्यक वस्तूंच्या निर्मि ती आणि प्राप्तीची प्रक्रिया विशद करतात.
(उदा. अन्न, पाणी, वस्त्र)
लक्षात घेऊया :
शेतीतील कामे - खालील दोन चित्रे पाहिल्यावर असे लक्षात येईल की, ही भाकरी आपल्यापर्यंत कशी पोहचत असेल?
त्यासाठी शेतात किती कष्ट घ्यावे लागतात आणि खूप कामे करावी लागतात.
धान्याचे पीक घेताना, शेतीच्या मशागती
पासून ते पोत्यात भरून गोदामात साठवून
ठेवेपर्यंत अनेक कामे करावी लागतात.
पेरणी - मग मृगाचा पाऊस पडला, की उन्हाळ्यात तापलेल्या जमिनीचा वाफसा होतो तेव्हा शेतात शेतकरी बियाण्याची
पेरणी करतात. मग काही कालावधी नंतर रोपांनी वर डोके काढल्यावर त्याबरोबर तणही वर येतात, तेव्हा शेतकरी ते तण
काढू न टाकतात.
कापणी - धान्याची ताटे वाढल्यावर त्यांना कणसे लागतात. दाणे पूर्ण भरल्यावर त्याची कापणी करावी लागते.
कापणी म्हणजे शेतात आलेली सर्व कणसे कापून गोळा करायची. आता पुढील दोन कामे समजून घेण्याकरिता आपण
एक कृ ती करूया.
आता हरभऱ्याच्या शेंगांचे दोन वाटे घ्या, त्यातला एक वाटा तुम्ही हाताने सोलून त्याचे दाणे वेगळे करायचे आणि
दुसरा कापडी पिशवीत भरून त्यावर वरवंटा फिरवून त्यांना धोपटून काढू न टाका, कोणत्या कृ तीतील दाणे अगोदर
निघतात ते पहा.
कृ ती के ल्यावर तुमच्या असे लक्षात आले की, पहिल्या कृ तीनुसार शेंगा
सोले पर्यंत दुसऱ्या कृ तीतील हरभरे वेगळे ही झाले होते. या कृ तीवरून शेतकरी
शेतातल्या पिकाचे कापणी झाल्यावर जे दोन कामे करतात ती आता पाहू या.
मळणी आणि उफणणी - ही दोन्ही कामे यंत्राने सहजरीत्या होतात. पूर्वी यंत्रे
नव्हती तेव्हा बैलांचा वापर करून ही कामे के ली जायची. यंत्रात कापणी के लेली
कणसे घालतात आणि यंत्राला बांधलेल्या पिशवीत दाणे गोळा के ले जातात. कणसातील टरफले आणि इतर कचरा
लांब जाऊन पडतो.
साठवण - उफणणी नंतर मिळालेल्या धान्याला कीड लागू नये तसेच उंदीर आणि घुशींनी नासाडी करू नये यास विशेष
काळजी घेऊन ती पोत्यात भरली जातात.
अन्नाची नासाडी टाळणे – खालील चित्राचे निरीक्षण के ल्यावर असे लक्षात येते की काही लोक ताटात अन्न घेतात परंतु
ते पूर्णतः संपवत नाहीत खरे तर ताटात पाहिजे तेवढेच घ्यायचे, अन्न वाया जाऊ द्यायचे नाही. अन्नपदार्थांच्या
उत्पादनामागे अने लोकांचे कष्ट असतात. म्हणूनच अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून सर्वांनी अन्नाची काळजी घेतली
पाहिजे. आपल्या आहारात येणारे पदार्थ हे शेतमळे, तळी, समुद्र, जंगल, पशुपालनगृहे अशा निरनिराळ्या ठिकाणांहून
येतात. यासाठी धान्याची वाहतूक, विक्री आणि खाद्यपदार्थ तयार करण्याची कामे करावी लागतात. तेव्हा अन्न आपल्या
ताटात येते.
शेतकरी शेतात एवढी मेहनत करून आपल्या पर्यंत धान्य पोहचवतो. तसेच फक्त भाकरी नव्हे तर इतरही
अन्नपदार्थ मिळवण्यासाठी सर्व लोक आपापल्या व्यवसायात खूप कष्ट घेत असतात. धान्याचे पीक घेताना, शेतीच्या
मशागतीपासून धान्य पोत्यात भरून गोदामात साठवून होईपर्यंत खूप खर्च येतो. म्हणून सर्वांनी अन्नाची नासाडी होणार
नाही याची काळजी घेतली पाहिजे.
सराव करूया :
प्र. 1) खालील चौकटीत काही शेतीविषयक आधारित शब्द लपलेले आहेत ते शोधा आणि त्याला गोल करा.
मा ज्वा री उ शिं इ
रे ग का री गा फ
ल हू ले व्हा डे मी
णे सा ना फ च ठ
का ग दे वं र क
म त क ण से ट
प्र. 4) खाली काही शेतीविषयक कामे दिली आहेत ती योग्य क्रमाने लावा.
योग्य क्रम
प्र. 5) शिं गाडे आणि मकाणे हे दोन खाण्याचे पदार्थ काही जणांच्या खाण्यात येतात. पण हे दोन पदार्थ कोणत्या
वनस्पतीपासून मिळतात आणि ते आपल्यापर्यंत कसे पोहोचतात? याची माहिती मिळवा.
1. अन्न, वस्त्र, माती, हवा ---------- 2. धरण, बोअरवेल, हौद, पाणपोई ------------
क) सहसंबंध लिहा.
प्र. 3)आई कालचे शिल्लक पाणी ओतून देत आहे, अशावेळी तुम्ही आईला काय सांगाल, ते लिहा. (1 गुण)
--------------------------------------------------------------------------------
2) तांदूळ ----------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र. 6) शेतातील कामे योग्य क्रमाने लिहा. (उफणणी, कापणी, नांगरणी, मळणी, पेरणी) (1 गुण)
1)------------→2)-------------→3)-------------→4)-------------→5)-----------------
कृ तिपत्रिका : 09
समजून घेऊया : वातावरण, हवा हे अनेक वायूंचे मिश्रण
संदर्भ : इयत्ता चौथी प्रकरण 9, हवा
अध्ययन निष्पत्ती : निरीक्षण /अनुभव / माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात आणि परिसरातील विविध
घटनांच्या आकृ तिबंधाचे अंदाज देण्यासाठी कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. (उदा. हवा)
लक्षात घेऊया : हवा
वरील चित्राप्रमाणे, पालक/शिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कृ ती करा आणि खाली दिलेल्या प्रश्नांद्वारे चर्चा करा.
1) फु ग्याचा आकार बदलत गेला का?
2) फु ग्याचा आकार कशामुळे बदलला ?
वरील कृ ती के ल्यास तुम्हास हे लक्षात आले असेल की, फु ग्यात भरलेली हवा ही आपल्याला जाणवते. परंतु ती
आपल्याला दिसत नाही. याचा अर्थ रिकाम्या वाटणाऱ्या जागेमध्येही हवा असते.
वातावरण - बाजूच्या चित्राचे नीट निरीक्षण करा. एक मुलगी डोंगरावर
चढत आहे. तिच्या पाठीवर एक बॅग आणि एक ऑक्सिजन सिलेंडर आहे
आणि नाकावर एक मास्क लावला आहे. आता विचार करा की, त्या मुलीने
ऑक्सिजन सिलेंडर का घेतला आहे? तुम्हाला काय वाटते? जसजशी ती
मुलगी डोंगरावर चढत जाईल तसतसा त्या मुलीला श्वास घ्यायला त्रास होईल.
याचा अर्थ असा होतो की, जसजसे उंच जावे तसतसे हवा विरळ होत जाते.
त्यामुळे त्या मुलीला श्वास घ्यायला त्रास होतो म्हणून तिला आपल्या बरोबर ऑक्सिजन सिलेंडर घ्यावा लागतो.
आपण ज्या पृथ्वीवर राहतो ती आकाराने चेंडू सारखी गोल आहे. पृथ्वीपासून
उंच गेल्यास जवळजवळ 50 किमीपर्यंत हवा आहे. पृथ्वी भोवतालच्या ह्या हवेच्या
आवरणाला वातावरण म्हणतात.
पृथ्वीपासून आपण जसजसे दूर जातो तसतसे वातावरणातील हवेचे थर विरळ
होत जातात. म्हणजे पृथ्वीच्या पृष्टभागाजवळ हवेचे थर सर्वाधिक दाटीवाटीने असतात,
तर वरचे थर एकमेकांपासून मोकळे असतात. म्हणजे उंचावरची हवा विरळ असते.
हवा हे अनेक वायूंचे मिश्रण : (पान क्र. 58 वरील करून पहा ही कृ ती शिक्षक / पालक यांच्या मदतीने करा आणि
तुम्हाला त्या कृ तीतून काय उलगडते ते नोंदवा.) या कृ तीत ज्वलनाला मदत करणारा हवेतील कोणता घटक असेल?
ऑक्सिजन : जळण्यास मदत करणार्या हवेतील या घटकाला ऑक्सिजन वायू म्हणतात. श्वसन व ज्वलनासाठी
हवेतील ऑक्सिजन वायू वापरला जातो.
कार्बन डाय ऑक्साईड : बाजूच्या चित्राचे नीट निरीक्षण करा. आणि या प्रकाश
संश्लेषण क्रियेत कोणता वायू वनस्पती घेत आहेत ?
तो आहे कार्बन डाय ऑक्साईड वायू. अन्न तयार करताना वनस्पती हवेतील
काबर्न डाय ऑक्साइडचा वापर करतात. उदा. सोडावॉटर मधून बाहेर पडणारा
वायू काबर्न डाय ऑक्साइड वायू असतो.
नायट्रोजन : पिकांसाठी पाणी आणि चांगली माती असली तरी भरघोस पिके येत नाहीत. त्यासाठी उत्तम दर्जाचे
खतही लागते. त्यामुळे पिकांची योग्य वाढ होते. हे खत तयार करण्यासाठी जो वायू वापरतात तो असतो नायट्रोजन
वायू. हवेतील सर्वांत मोठा भाग नायट्रोजन वायूचा असतो.
बाष्प : बर्फ टाकू न थंड झालेल्या पेल्यावर बाहेरून पाण्याचे कण जमा होतात, म्हणजे हवेत पाणीही वायुरूपात
असते. असे अनेक वायू हवेत असतात, म्हणजे हवा हे अनेक वायूंचे मिश्रण आहे.
सराव करूया :
प्र. 1) कृ ती करा.
इंजेक्शनच्या सिरिं जमध्ये औषध घेण्यापूर्वी सिरींजची दांडी आधी आत
दाबतात. ते कशासाठी ? ही कृ ती करून पहा आणि निरीक्षण करून वहीत
नोंदवा.
प्र.2) बाजूला दिलेल्या आकृ तीचे नीट निरीक्षण करा. ती कृ ती तुम्ही स्वतः
करून पहा आणि नाकातून प्रामुख्याने कोणता वायू शरीराच्या आत घेतो ते
लिहा. तसेच कोणता वायू नाकाच्या बाहेर सोडतो ते ही नोंदवा. तसेच या
क्रियेला काय म्हणतात ते लिहा.
प्र. 3) खाली काही वायूंबद्दल विशेष माहिती दिली आहे त्यावरून त्या वायूचे योग्य नाव ओळखून लिहा.
कापड हे अनेक घटकांपासून बनते. विविध स्त्रोतांपासून मिळणारे धागे एकमेकांत गुंफू न कापड किं वा वस्त्र
तयार होते. कापूस, लोकर, ताग, रेशमी किडे यांपासून नैसर्गि करित्या मिळवलेल्या धाग्यांना नैसर्गि क धागे तर
डांबरासारख्या पदार्थापासून मिळविलेल्या नायलॉन, रेयॉन सारख्या धाग्यांना कृ त्रिम धागे म्हणतात.
खालील चित्रांचे निरीक्षण करा. त्यांच्या वस्त्रामध्ये विविधता का दिसून येते? याचा विचार करा.
चित्रांवरून असे लक्षात येते की, वेगवेगळ्या ठिकाणी असलेल्या व्यक्ती वेगवेगळ्या प्रकारचे कपडे परिधान
करताना दिसतात. त्यांच्या कपड्यांमध्ये असणारी विविधता ही सांस्कृ तिक व भौगोलिक कारणांमुळे दिसून येते.
मनुष्य प्राणी वेगवेगळ्या ऋतूनुसार वेगवेगळे कपडे वापरतो. उन्हाळ्यात सुती कपडे, हिवाळ्यात लोकरीचे
कपडे तर पावसाळ्यात कृ त्रिम धाग्यांचे कपडे वापरतो.
सराव करूया :
1) चित्र पहा व त्यानुसार प्रश्नांची उत्तरे लिहा.
3) भारतातील काही ठिकाणे विशिष्ट प्रकारच्या कापडासाठी प्रसिद्ध आहेत, अशी कोणतीही दोन ठिकाणे व तेथील
प्रसिध्द कापड यांची नावे लिहा .
ठिकाण प्रसिद्ध कापड
अ) १)
ब) २)
4) पुढील प्रसंगी कोणत्या प्रकारचे कपडे वापरायला हवे असे तुम्हास वाटते ?
अ) सीमा थंड हवेच्या ठिकाणी सहलीला जात आहे.
तुम्हाला छातीच्या आत सुरु असलेली हृदयाची धडधड जाणवली असेल. बाहेरून दिसणा-या बाह्येंद्रीयांप्रमाणे
(उदा. डोळे, कान, नाक इ.) शरीराच्या आतील भागात देखील इंद्रिये असतात. ही इंद्रिये बाहेरून दिसत नाहीत त्यांना
आंतरेंद्रिये म्हणतात.
आंतरेंद्रिय :
काही आंतरेंद्रिये
अ) तोंड आणि जठर ही आंतरेंद्रिये अन्न पचनाचे काम करतात. तोंडातील घास वक्षपोकळीतील जठरापर्यंत नेण्याचे काम
ग्रासनलिका किं वा ग्रासिका करते.
ब) हृदय वक्षपोकळीत मधोमध पण किं चित डाव्याबाजूला असून ते आपल्या हाताच्या मुठीएवढे असते. हृदयाच्या
आकुं चन आणि शिथिलीकरण यामुळे संपूर्ण शरीरभर पसरलेल्या रक्त वाहिन्यातून रक्त खेळते राहण्यास मदत होते.
क) फु प्फु स हे वक्षपोकळीत असतात. श्वासावाटे आत घेतलेली हवा श्वासनलिका मार्फ त फु प्फु सापर्यंत पोहचवली जाते.
श्वासनलिके च्या दोन शाखांना श्वसनी म्हणतात.
ड) मेंदू शिरोपोकळीत कवटीच्या आत संरक्षित असतो. हालचालींवर नियंत्रण असणे, भावनांची जाणीव इ.कामे मेंदू
करतो.
सराव करूया :
प्र.4) दुचाकीवरून प्रवास करताना हेल्मेट वापरणे आवश्यक आहे का? कारण लिहा .
5) पाठ्यपुस्तक पान क्र.71 मध्ये 'करून पहा' मधील कृ ती करा, काय घडले व असे का घडले ते लिहा .
अधिक अभ्यासासाठी लिं क्स :
हृदय
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292497749270528138805
आंतरेंद्रिये
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292497691025408138803
ग्रासनलिका
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
31329249772118016013880
कृ तिपत्रिका :12
समजून घेऊया : घरगुती उपचार, आरोग्य सेवा
संदर्भ : इयत्ता चौथी, प्रकरण -12, छोटे आजार आणि घरगुती उपचार
अध्ययन निष्पत्ती: निरीक्षणे/अनुभव/माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात, आरोग्य रक्षण करण्यासाठी उपाय
समजून घेतात. आरोग्य सेवांची माहिती सांगतात.
लक्षात घेऊया:
खाली दिलेल्या चित्रांचे नीट निरीक्षण करा. चित्रांपैकी तुम्ही एखादा अनुभव घेतला आहे का ?
विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला किरकोळ दुखापती होत असतात. कधी कापते, खरचटते, पाय मुरगळतो, सर्दी
होते किं वा डोके दुखायला लागते तर कधी घसा दुखायला लागतो. अशा वेळी तुम्ही कोणता उपाय करता? यावेळी
आपण बाम लावतो, गरम पाण्याचा वाफारा घेतो, आल्याचा चहा पितो, जरा विश्रांती घेतो.
आपल्या घरातील अनुभवी माणसे किरकोळ आजारांवर किं वा दुखापतींवर काही खालील घरगुती उपाय
सुचवतात.
1)घसा दुखत असेल तर गरम पाण्यात हळद आणि मीठ घालून गुळण्या कराव्यात.
2)सर्दी झाली असेल तर गरम पाण्याचा वाफारा घ्यावा. छाती शेकवावी.
3)उलट्या होत असतील तर लिं बाचे सरबत घ्यावे.
4)जखम झाल्यास पाण्याने धुवावी. नंतर कोरडी करून त्यावर आयोडीन लावावे.
5) ताप आल्यावर डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवतात. हात पाय ओल्या कापडाने पुसतात.
परंतु घरगुती उपचारांना काही मर्यादा असतात. दोन दिवसात बरे वाटले नाही तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आरोग्य सेवा : समाजाच्या आरोग्याची काळजी घेणा-या किं वा आजाऱ्यांना उपचार देणा-या सेवेला आरोग्य सेवा किं व
वैद्यकीय सेवा म्हणतात.
मोठ्या शहरांमध्ये अद्ययावत इस्पितळे, डॉक्टरांचे दवाखाने असतात. ग्रामीण भागातही प्राथमिक आरोग्य कें द्र आणि
शासकीय रुग्णालये असतात. रुग्णांना येथे सवलतीच्या दरात औषधोपचार मिळतात.
सराव करूया :
अ) रविवार सुट्टीचा दिवस होता. सर्व दवाखाने बंद होते. बबनच्या शरीराचा ताप कमी होत नव्हता.
ब ) मैदानात खेळताना सोनम खाली पडली. तिच्या हाताला दुखापत झाली आहे.
प्र.2) तुम्ही अनुभवलेल्या कोणत्याही आजाराचे व त्यावर के लेल्या उपायांचे थोडक्यात वर्णन करा.
प्र.3) तुमच्या शाळेत असलेल्या प्रथमोपचार पेटीतील कोणत्याही चार साहित्याची नावे लिहा.
प्र.5) डोके दुखी, अपचन झाल्याने होणा-या उलट्या साठी कोणता घरगुती उपाय कराल ?
क) थंडगार लिं बाचे सरबत प्यावे ड) डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या घड्या ठेवाव्यात
उत्तर :
उपदिशा- तुम्हांला मुख्य दिशा माहीत आहेत! चार मुख्य दिशा आहेत. ह्या मुख्य दिशा दरम्यान ज्या दिशा येतात त्या
उपदिशा. त्या चार आहेत.ईशान्य, आग्नेय, नैऋत्य, वायव्य ह्या उपदिशा आहेत. त्या कशा ओळखायच्या? तर उत्तर व पूर्व
मुख्य दिशामध्ये ईशान्य उपदिशा येते. पूर्व व दक्षिण मुख्य दिशामध्ये आग्नेय उपदिशा असते. दक्षिण व पश्चिम ह्या मुख्य
दिशामध्ये नैऋत्य उपदिशा असते तर पश्चिम व उत्तर मुख्य दिशामध्ये वायव्य ही उपदिशा असते. दोन मुख्य दिशांच्या
दरम्यान अनेक वस्तू असतात. या वस्तूंची दिशा निश्चित होण्यासाठी उपदिशांचा वापर होतो.
दिशाचक्र :
मुख्य दिशा व त्या दरम्यान असणाऱ्या उपदिशा मिळू न तयार होते ते दिशाचक्र.सोबतच्या चित्रातून हे दिशाचक्र
चटकन लक्षात येते.
प्रमाणबद्धता - दिशेच्या माध्यमातून आपण आपले गाव, घर, शाळा, परिसरातील विविध वास्तू निश्चितपणे दाखवू
शकतो. ह्या सर्व गोष्टीतील अंतरासाठी(अंतर दाखवण्यासाठी) उपयोग होतो तो नकाशाचा! त्यामुळे दिशा व नकाशा
यांचा परस्परसंबंध येतो. परिसरातील ठिकाणे काही अंतरावर असतात, त्यांचा आकारही मोठा असतो, मात्र नकाशाचा
आकार लहान असतो त्यामुळे नकाशात अंतर दाखवताना ते कमी करावे लागते, त्यासाठी गरज असते प्रमाणाची !
चित्र काढताना जसा आपण कागदाचा आकार पाहून चित्र रेखाटतो, तसेच जमिनीवरील दोन ठिकाणांमधील
अंतर विचारात घेऊन, ते नकाशात किती प्रमाणात कमी करावे ते ठरवले जाते. म्हणजेच नकाशातील ठिकाणांमधील
अंतर हे प्रमाणबद्ध असते. उदा. दोन ठिकाणामधील अंतर 10 किमी असल्यास नकाशात ते अंतर 1 किमी = 1 सेमी असे
घ्यावे.
सराव करू या :
प्र.1) चित्रात डोंगर, विहीर, दिव्याचा खांब, किल्ला ही चित्रे मुख्य दिशांवर नाहीत. ती चित्रे कोणत्या दोन दिशांच्या
दरम्यान आहेत, ते निरीक्षण करा व खालील चित्राची उपदिशा रकान्यात लिहा.
चित्र उपदिशा
डोंगर
विहीर
दिव्याचा
खांब
किल्ला
प्र.2) ठिकाणाचे स्थान किं वा बाजू सांगताना आपण कशाचा वापर करतो?
प्र.5) खालील चौकटीत मधोमध तुमचे घर आहे, आता बाजूला पिवळ्या चौकटीत दिशा व तुमच्या घराशेजारील इतर
ठिकाणे दाखवा. (झाड, रस्ता, शाळा, घरे)
दिशा व नकाशा
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_3128956134698
9260815349
प्रमाणबद्धता
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292498019680256138814
कृ तिपत्रिका : 14
समजून घेऊया : सूची व खुणा, नकाशाचा वापर/वाचन
अध्ययन निष्पत्ती : 1)नकाशाचा वापर करून वस्तू /ठिकाणे यांच्या खुणा / स्थान ओळखतात व जवळच्या खुणेवरून
शाळा / शेजार यांच्या दिशांचे मार्गदर्शन करतात.
2)नकाशातील चिन्हे, खुणा व सूची यांचा वापर करून नकाशाचे वाचन करतात.
लक्षात घेऊया :
सूची व खुणा-मुलांनो, नकाशा तुम्ही पहिला असेल! नकाशात द्यायची माहिती ही चिन्हे, चित्रे, खुणा, रंगाच्या
छटा यांच्या मदतीने दाखवतात. त्याची यादी नकाशात दिली असते. तिला ‘सूची’ असे म्हणतात. सुचीमुळे आपल्याला
नकाशा समजून घ्यायला मदत होते. नकाशावाचन सुलभ होण्यास सूची व खुणा आपणास सहाय्यभूत ठरतात. मुलांनो,
शेजारील आराखड्याचे निरीक्षण के ल्यास यामध्ये घर, झाड, ऑफिस, रुग्णालय, बाजार इत्यादी बाबी विशिष्ट खुणांनी
दाखविले आहेत. त्याचे नीट निरीक्षण करा. कशासाठी कोणत्या खुणा, चिन्ह दर्शविले आहे ते पहा.
प्र. 1) खुणांच्या आधारे तुमच्या परिसराचा आराखडा (नकाशा) एका कागदावर काढा.
प्र. 2) जॉनला त्याच्या परिसराचा नकाशा तयार करायचा आहे.परिसरात त्याला पुढील गोष्टी दिसल्या, त्यापैकी
कोणत्या गोष्टी त्याने नकाशात दाखवाव्यात? मदत करा.
घर, उडणारा कावळा, पोलीस स्टेशन, गाई, टपाल कार्यालय, म्हशी, शाळा, मोटारगाडी, चौक, रस्ता, टॉवर,
रेल्वेगाडी, रेल्वेस्टेशन व शेत
प्र. 4) इ.4 थी प.अ.- 1 मधील पृष्ठ क्र. 90 वरील नकाशा निरीक्षण/वाचन करा.उत्तरे लिहा.
ब)खूण काढा .
बंदर - लोहमार्ग –
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_312600394195
57478423015
राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र पुणे - 30
पूर्वतयारी सेतू अभ्यासक्रम चाचणी क्र. 02
इयत्ता : पाचवी विषय : परिसर अभ्यास भाग 1 गुण : 10
कृ तिपत्रिका : 09 ते 14 वेळ : 30 मिनिटे
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र.2) “शिखर किं वा पर्वत सर करताना ऑक्सिजन सिलिं डर सोबत नेला जातो.” का? (1 गुण)
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
अ) मेंदू : --------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
आ) हृदय : ------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र.4) अपचन झाल्याने सतत उलट्या होत असतील तर कोणता घरगुती उपाय करावा? (1 गुण)
---------------------------------------------------------------------
प्र.5 तुमच्या शाळेच्या इमारतीची लांबी नकाशात 40सेमी दाखवली आहे.जर नकाशातील प्रमाण 1 सेमी = 1
मीटर दिले असेल, तर शाळेची लांबी किती असेल? (1 गुण)
--------------------------------------------------------------------------------
***
कृ तिपत्रिका : 15
समजून घेऊया : महाराष्ट्र प्राकृ तिक रचना, पिके व भाषा यातील विविधता
संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण 15, माझा जिल्हा माझे राज्य
अध्ययन निष्पत्ती :
1)आपला जिल्हा व राज्य यांची प्राकृ तिक व मानवनिर्मि त घटक या अनुसंधाने तुलना करतात.
2)नकाशात जिल्हे व राज्यानुसार प्रमुख खाद्यान्न पिके व प्रसिद्ध खाद्यपदार्थ दाखवतात.
लक्षात घेऊया :
महाराष्ट्र हे आपले राज्य आहे. या महाराष्ट्राचे प्राकृ तिक रचनेनुसार तीन प्रमुख विभाग पडतात. किनारपट्टीचा
प्रदेश, पर्वतीय प्रदेश व पठारी प्रदेश. मुंबई ही महाराष्ट्राची राजधानी तर नागपूर ही उपराजधानी आहे. गोदावरी ही
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी आहे, तर राज्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे. महाराष्ट्राच्या उत्तर भागात सातपुडा
पर्वतरांग असून त्यात अस्तंभा हे सर्वात उंच शिखर तर सह्याद्री पर्वतास पश्चिम घाट असेही म्हणतात. यात कळसूबाई हे
महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे.( ही प्राकृ तिक रचना तुम्ही प.अ.अभ्यास-1 मधील पृष्ठ क्रमांक-94 वरील महाराष्ट्र
राज्य प्राकृ तिक नकाशा आहे ती अभ्यासून पहा.)
पिके व भाषा यातील विविधता -
महाराष्ट्राच्या प्राकृ तिक रचनेमध्ये जशी विविधता आहे, तशी विविधता पिकांमध्ये व भाषेमध्ये सुद्धा दिसते.
महाराष्ट्र राज्य जास्त, मध्यम व कमी पावसाचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. त्यानुसार येथे विविध पिके पिकतात.
शेतातील पिकांचे उत्पादन हे हवामान, मृदा व पाण्याच्या उपलब्धतेवर अवलंबून असते, कमी-जास्त पावसामुळे येथे
पिकांच्या बाबतीत विविधता आढळते. शेती हा महाराष्ट्राचा प्रमुख व्यवसाय आहे. येथे पावसाच्या प्रदेशानुसार पुढील
पिके घेतली जातात.(यासाठी पृष्ठ क्रमांक-95 महाराष्ट्र राज्य वार्षि क पर्जन्यमान हा नकाशा अभ्यासा.)
पावसाचे प्रदेश व मुख्य पिके :
तूर बाजरी
सोयाबीन मटकी
भाषेतील विविधता:
माणूस हा एकमेकांशी भाषेच्या मदतीने बोलतो, आपले विचार दुसऱ्यापर्यंत पोहचवतो. एकच भाषा वेगवेगळ्या
प्रदेशांत वेगवेगळ्या पद्धतीने बोलली जाते. प्रदेशांनुसार त्या भाषेतील शब्दांचे उच्चार बदलतात. त्यावर इतर भाषांचा
प्रभाव पडतो. इतर भाषांतील शब्द आपल्या भाषेत येतात. आणि त्यामुळेच भारतातील राज्यांची निर्मि ती भाषांच्या आधारे
झाली.
मराठी ही महाराष्ट्राची राजभाषा. भाषेच्या बाबतीत आपल्या राज्यात साम्य तसेच विविधताही दिसते.
वेगवेगळ्या प्रदेशांत मराठी भाषेच्या उच्चारांमध्ये बदल जाणवतो, त्यामुळे राज्यात बोलीभाषेच्या बाबतीत विविधता
दिसून येते. विविध प्रदेश व मराठीच्या काही बोली पुढीलप्रमाणे दिल्या आहेत. त्या अभ्यासा. तुमच्या परिसरात कोणत्या
बोलीभाषा बोलल्या जातात या बाबत माहिती घ्या.
विविध प्रदेश मराठीच्या काही बोली
कोकण कोकणी, मालवणी
विदर्भ वऱ्हाडी
खानदेश अहिराणी(खानदेशी)
आपल्या महाराष्ट्राची राजभाषा मराठी असली तरी, आपल्या राज्यात विविध भागात, प्रदेशात विविध
बोलीभाषा बोलल्या जातात. त्याच बरोबर महाराष्ट्राच्या विविध भागात आदिवासी जमातीचे लोक राहतात त्यांच्या
बोलीभाषेत पण विविधता आहे.
गोरमाटी, कोलामी, कोरकू इत्यादी महाराष्ट्रातील आदिवासी जमातीच्या पारंपारिक बोलीभाषा आहेत.
सराव करू या :
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
ब) नागपूर ---------------
क) पुणे ---------------
प्र.4) इ.4 थी प.अ.-1 मधील पृष्ठ 97 वरील नकाशा अभ्यासा व खालील पिके कोणत्या जिल्ह्यात जास्त प्रमाणात
होतात ते लिहा.
आंबा
कांदा
कापूस
प्र.5) चिन्हे व खुणा ओळखून त्यांची नावे लिहा.
-----------------------
-----------------------
------------------------
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_312600394203
365376230
नकाशाशी मैत्री
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292498331967488138823
कृ तिपत्रिका : 16
समजून घेऊया : सूर्योदय व सूर्यास्त, लहान- मोठा दिवस
संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण- 16, दिवस व रात्र
अध्ययन निष्पत्ती : निरीक्षणे /अनुभव/ माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात आणि परिसरातील विविध घटनांच्या
आकृ तिबंधाचे अंदाज देण्यासाठी कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. (उदा. दिवस व रात्र)
लक्षात घेऊया :
खालील चित्रांचे निरीक्षण करा.
(1)
चित्राचे निरीक्षण के ल्यावर हे उलगडले की, ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पडतो तेथे दिवस आहे असे
म्हणतात. ज्या भागावर सूर्याचा प्रकाश पोहचत नाही तेथे अंधार पडतो. तेथे रात्र आहे असे म्हणतात. सूर्य सकाळी पूर्वेकडे
उगवतो तेव्हा सूर्योदय होतो आणि सायंकाळी तो पश्चिमेकडे मावळतो म्हणजे सूर्यास्त होतो. म्हणून सूर्य पृथ्वीभोवती
फिरतो असे आपल्याला वाटते. पण तो के वळ भास असतो. प्रत्यक्षात पृथ्वी स्वतःभोवती फिरते. म्हणून पृथ्वीवर दिवस
आणि रात्र होतात.
(2)
` चित्र पहा, निरीक्षण के ल्यावर आपल्याला ही जुलै 2021 ची दिनदर्शि का आहे हे समजले असेलच तर यामध्ये
तुम्हाला दिनांक, वार याशिवाय प्रत्येक दिनांकाच्या खाली एक लहान चित्र व काही फिकट निळ्या रंगाचे आकडे दिसले
असतील. यामध्ये सुरुवातीला सूर्याचे पिवळे-लाल चित्र दिसते आणि त्याच्यापुढे आकडा दिसतो ती सूर्योदयाची
घड्याळी वेळ आहे; त्याच्यापुढे अजून एक सूर्याचे चित्र आहे पण ते पहिल्या चित्रापेक्षा वेगळे आहे कारण ती आहे
सूर्यास्ताची घड्याळी वेळ. सर्व दिनांकाच्या खाली सूर्योदयाच्या व सूर्यास्ताच्या वेळा पहा. सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ
प्रत्येक दिनांकाप्रमाणे बदलताना दिसते. या निरीक्षणातून तुम्हाला आणखी एक खात्री झाली, की दररोज दिवस सुमारे
बारा तासांचा आणि रात्र बारा तासांची असे नसते.
21 मार्च रोजी अचूक 12 तासाचा दिवस आणि 12 तासाची रात्र असते. त्यानंतर हळू हळू आपल्याकडे दिवस
मोठा होत जातो. रात्र लहान होत जाते. ज्या काळात दिवस मोठा आणि रात्र लहान असते, त्या काळात उन्हाळा येतो.
असे 21 जूनपर्यंत चालते.
21 जून या तारखेला आपल्याकडे सर्वांत मोठा दिवस आणि सर्वांत लहान रात्र असते. 21 जूनपासून दिवस
लहान होत जातो आणि रात्र मोठी होत जाते. असे 22 सप्टेंबरपर्यंत चालते. परत एकदा 22 सप्टेंबर रोजी 12 तासाचा
दिवस आणि 12 तासाची रात्र असते. त्यापुढील काळात दिवस आणखी लहान होत जातो. रात्र आणखी मोठी मोठी होत
राहते. असे 22 डिसेंबरपर्यंत चालते. ज्या काळात दिवस लहान आणि रात्र मोठी असते, त्या काळात हिवाळा येतो. 22
डिसेंबर या तारखेला आपल्याकडे सर्वांत लहान दिवस आणि सर्वांत मोठी रात्र असते. 22 डिसेंबरपासून दिवस मोठा होत
जातो आणि रात्र लहान होत जाते. असे 21 मार्चपर्यंत चालते. 21 मार्चपासून हेच चक्र पुन्हा नव्याने सुरू होते.
सराव करू या :
दिनांक 4 8 12 24
मे महिन्यातील सूर्योदय
मे महिन्यातील सूर्यास्त
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
अ) अमावस्येला चंद्र आकाशात असतो, पण दिसत नाही. त्याचे कारण काय असेल ?
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र. 4) दिवस व रात्र यांमधील लहान-मोठेपणा ठरवा. त्यासाठी >, <, = ही चिन्हे वापरा.
1 21 मार्च
2 21 जून
3 22 सप्टेंबर
4 22डिसेंबर
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292498456756224138826
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292498527518720138828
कृ तिपत्रिका : 17
समजून घेऊया : जडणघडण
संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण-17, माझी जडणघडण
अध्ययन निष्पत्ती: कु टुंब/ शाळा / शेजार या ठिकाणी निरीक्षण के लेल्या / अनुभवलेल्या समस्यांवर स्वतःचे मत
मांडतात. (उदा. साचेबद्धपणा/ भेदभाव/ बालहक्क)
लक्षात घेऊया :
लहानाचे मोठे होताना आपण अनेक छोट्या-मोठया गोष्टी शिकत जातो. त्यातून आपल्या सवयी घडत
जातात. आपल्या आवडीनिवडी ठरत जातात. हळू हळू आपले विचार पक्के होऊ लागतात. यालाच आपली 'जडणघडण
होणे’ असे म्हणतात.
हे प्रसंग सर्वांच्या घरात तसेच आजूबाजूला आपण बाहेर वावरताना होत असतात. यातूनच आपण चांगले
संस्कार शिकत जातो; यासाठी घरातील वातावरण व सभोवतालचे व्यक्ती जे करतात त्यांच्या अनुकरणातून आपण
संस्कार आणि खूप काही नवीन गोष्टी शिकत असतो. वरील तिन्ही चित्रांमध्ये कु टुंबातील व्यक्ती, नातेवाईक, शेजारी असे
अनेक लोक दिसत आहेत त्यांच्याकडू नही आपल्याला खूप काही शिकायला मिळते.
अवतीभवती बघून आपण अनेक गोष्टी शिकत असतो. आपल्या मित्रमैत्रिणी कशा बोलतात? कोणते कपडे
घालतात? कोणते खेळ खेळतात? अभ्यास कसा करतात? हे अनेकदा आपण नकळतपणे शिकतो. बऱ्याचदा शेजाऱ्यांनी
आपल्याला लहानपणापासून पाहिलेले असते. आपल्याविषयी त्यांना जिव्हाळा असतो. शेजाऱ्यांमुळे आपल्याला
चांगल्या सवयी लागू शकतात. चांगला शेजार आपल्या जडणघडणीत महत्वाचा असतो.
सराव करू या :
प्र.4) तुम्हाला माहीत असणाऱ्या तुमच्या एका शेजाऱ्यांची पुढील माहिती मिळवा व वहीत लिहा.
माझी जडणघडण
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
31257292265399910421693
आपला शेजार
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292498737709056138835
कृ तिपत्रिका : 18
काही वेळा शिक्षणासाठी मुले-मुली दुसऱ्या ठिकाणी जातात. तसेच कामधंदा नोकरी-व्यवसायानिमित्त
घरातील व्यक्ती दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहू लागतात. अशा प्रकारे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन राहण्याला
'स्थलांतर करणे’ असे म्हणतात.
कु टुंबातील माणसांची संख्या जशी वाढली तसे फ़क्त शेती करून कु टुंबातील सर्वांचे पोट भरेनासे झाले.
व्यापार आणि नवनवीन उद्योगधंदे यांचा विकास होत गेला. शहरे वाढू लागली. पोटापाण्यासाठी माणसं जिथे कामधंदा
मिळेल तिथे जाऊन राहू लागली. मोठी कु टुंबे विखुरली गेली. त्यामुळे कु टुंबे छोटी झाली.
गेल्या काही वर्षात शिक्षण आणि नोकरी-व्यवसायाच्या निमित्ताने दुसऱ्या राज्यात आणि परदेशात जाण्याचे प्रमाणही
खूप वाढले आहे. काही वेळा कु टुंबातील एखादी व्यक्ती परदेशात असते, तर एखादी व्यक्ती आपल्याच देशातील दुसऱ्या
शहरात असते. त्यामुळे कु टुंबही बदलत आहे.
पक्षीसुद्धा स्थलांतर करतात. अन्न आणि निवारा यासाठी अनेक पक्षी स्थलांतर करतात. आकाशात इंग्रजी
व्ही (V) अक्षरासारखा आकार करून उडणाऱ्या हंसांचा थवा तुम्ही पाहिला असेलच, काही पक्षी दरवर्षी ठरावीक वेळी
एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात. काही पक्षी दूरवर उडत जातात, तर काही जवळच्याच ठिकाणी
जाऊन राहतात.
सराव करू या :
प्र. 1) तुमच्या माहितीतील स्थलांतर करून आलेल्या कु टुंबाची खालील मुद्द्यांनुसार माहिती मिळवा.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
आ) तुमच्या मते पक्षी स्थलांतर का करत असतील?
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
इ) कु टुंबे लहान का झाली? तुमच्या शब्दात लिहा?
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
बदलती कु टुंबे
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_3130461062112
952321739
बदलते शेजारी
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292498904621056138840
कृ तिपत्रिका : 19
शाळेत वेगवेगळी मुलेमुली भेटतात. आपल्यापैकी काहींना दिसत नाही, ऐकू येत नाही, काहींना सहजपणे
चालता येत नाही. या वर्गातील मित्रमैत्रिणींच्या गरजा आपल्यापेक्षा वेगळ्या आणि विशेष असतात. त्यांच्या
सहवासातूनच आपल्याला त्या समजतात.
विशेष गरजा असलेल्या सर्वांनाच शिकण्याचा अधिकार आहे. शासन या विद्यार्थ्यांसाठी विविध योजना
राबवते. आपण अशा मुलांना शाळेत जाण्यास प्रोत्साहन द्यावे. खालील चित्राचे निरीक्षण के ल्यास तुम्हांला लक्षात येईल
की वर्गातील शिक्षण हे सर्वाना समान असते.
दुसरीकडे मुलींचे शिक्षण पण एक समस्या आहे. शासन मुलींच्या शिक्षणासाठी अनेक सुविधा उपलब्ध
करते. मात्र घरी भावंडाना सांभाळणे, पाणी भरणे, घरकाम करणे ही कामे बहुतांश मुलींवर सोपवली जातात. त्यामुळे
त्यांचे शिक्षण रखडते, बंद पडते. त्यामुळे मुलींनाही शिक्षणाचा आनंद मिळाला पाहिजे.
सराव करू या :
प्र. 1) वाक्यातील अयोग्य पर्याय खोडा.
अ)एकमेकांना मदत / वाद के ल्याने कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करता येते.
ब)शाळेत आपल्याला वेगवेगळी / एकसारखी मुले-मुली भेटतात.
प्र. 2) विशेष गरजा असलेली मुले-मुली तुम्हास भेटली, तर तुम्ही काय कराल, ते लिहा.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र. 3) विशेष गरजा असणाऱ्या मुलांसाठी कोणत्या योजना/सुविधा शासन पुरवते? शिक्षकांशी चर्चा करून लिहा.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र. 5) ‘शिकण्याचा समान अधिकार’ ह्यावर घोषवाक्य बनवा. वर्गात ही घोषवाक्ये भिं तीवर चिकटवा.
--------------------------------------------------------------------------------
-------------------------------------------------------------------------------
प्र. 6) तुमच्या वर्गात दुसऱ्या गावाहून आलेल्या एका मुलाने नव्याने प्रवेश घेतला आहे. त्याला त्याच्या आधीच्या
शाळेविषयी माहिती विचारा. शिक्षकांना लिहून पाठवा.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
चित्रात दिसतात त्याप्रमाणे, रस्त्यावरून जाताना हातात पांढरी काठी घेऊन चाललेली एखादी व्यक्ती तुम्ही
गावात, शहरात पाहिली असेल, त्या पांढऱ्या काठीच्या मदतीने दृष्टीहीन व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी मोकळेपणाने वावरू
शकते. काही ठिकाणी ब्रेल लिपीमध्ये लिहलेले असते, त्याचाही वापर ह्या व्यक्ती आपल्या सोईसाठी
करतात.(उदा.मतदान यंत्र, लिफ्टपाशी मजले क्रमांक). पायाने किं वा शरीराने अधू असणाऱ्या व्यक्तींसाठी
शाळा-महाविद्यालय, स्टेशन इ. ठिकाणी उताराचा / चढणीचा रस्ता असतो. तर कर्णबधीर व्यक्तींसाठी खुणांची भाषा
असते. विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती म्हणजे त्या इतर कोणी नसून त्या सर्वसामान्य व्यक्तींसारख्याच आहेत, त्यांच्यात
भेदभाव करू नये. आपल्या समाजात विशेष गरजा असणाऱ्या व्यक्ती आपल्या दिव्यांगत्वावर मात करून पुढे गेल्या
आहेत. (उदा. नर्ति का - सुधा चंद्रन, संगीतकार - रविं द्र जैन, जलतरणपटू - शरद गायकवाड)
संवेदनशीलता
आपल्या कु टुंबातील आणि परिसरातील व्यक्तींच्या अडीअडचणी समजून घेणे, वेळप्रसंगी त्यांना मदत करणे
म्हणजे संवेदनशील असणे होय.आपल्या कु टुंबात असणाऱ्या वृद्ध किं वा आजारी आजी-आजोबांना, मोठ्यांना आवश्यक
मदत करणे. त्यांनी सांगितलेले नम्रपणे ऐकणे. विशेष गरजा असणाऱ्या व्यक्तीना मदत करणे. उदा. रस्त्यात कोणी
दृष्टीहीन चालत असल्यास त्यांना रस्ता पार करण्यास मदत करणे, त्यांना आवडलेली गोष्ट वाचून दाखविणे,
कर्णबधिरांशी सावकाश आणि स्पष्टपणे बोलत संवाद साधणे. अशा प्रकारे ह्या सर्वच व्यक्तींशी आपण प्रेमाने व आदराने
वागले पाहिजे, त्यातूनच आपली संवेदनशीलता दिसते.
सराव करू या :
प्र. 1) मित्रांनो, घरात, शेजारी आजारी, वृद्ध, विशेष गरजा असणारी व्यक्ती असतील तर पुढीलपैकी तुम्ही काय कराल?
जे योग्य वाटते त्यासमोर ✔ अशी खूण करा. जे अयोग्य वाटते तेथे ✖ अशी खूण करा.
प्र. 4) घरात आजीला तहान लागली आहे, आजीला चालता येत नाही. तर अशावेळी तुम्ही काय कराल?
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र. 5) आपल्या समाजातील विशेष गरजांवर मात करून यशस्वी झालेल्या व्यक्तींची माहिती मिळवा. वहीत नोंद करा.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_3125769228912
7219216367
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292499230203904138849
कृ तिपत्रिका : 21
समजून घेऊया : व्यवस्थापनाचे महत्त्व व गरज
संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण-21, समूहजीवनासाठी व्यवस्थापन
अध्ययन निष्पत्ती : गटात एकत्र काम करत असताना एकमेकांविषयी आस्था, समानानुभूती व नेतृत्वगुण या बाबींमध्ये
पुढाकार घेतात व सक्रिय सहभाग घेतात. उदा. वर्गातील (Indoor) / वर्गाबाहेरील (Outdoor) / स्थानिक /
समकालीन उपक्रम आणि खेळ तसेच वनस्पतींची काळजी घेणे, पशू पक्ष्यांना खायला देणे. भोवतालच्या वस्तू /
वडीलधारे / दिव्यांग यांच्यासाठी प्रकल्प करणे / भूमिका करतात.
लक्षात घेऊया :
व्यवस्थापन म्हणजे काय? व्यवस्थापन कधी करावे? व्यवस्थापनाची गरज कोठे लागते? त्याचे महत्व काय?
याबाबत शिक्षक विद्यार्थ्यांशी चित्राद्वारे, प्रसंगाद्वारे चर्चा घडवून आणतील.
आता मुलांनो, पुढील चित्र पहा. चित्रावर आधारित पुढील प्रसंग वाचा. प्रसंगातून काय जाणवते हे शिक्षकांना
सांगा.
श्रद्धा, आयेशा आणि एमिली या तिघींच्या कु टुंबियांनी उन्हाळी सुट्टीत सहलीला जायचे ठरवले, त्यासाठी त्यांनी
खास गाडी ठरवली. सहलीच्या दिवशी सकाळी सर्वजण बराच वेळ गाडीची वाट पहात राहिले, पण गाडी काही आलीच
नाही, फोनवर चौकशी के ल्यावर कळले की, गाडी चालकाला सर्वजण कोठे थांबणार हे माहीतच नव्हते. हा गोंधळ
कशामुळे झाला? तर व्यवस्थापन नसल्याने!
कोणतेही काम करण्यासाठी किमान व्यवस्थापन आवश्यक असते, म्हणजेच आपण काम कसे करणार? कधी
करणार? याचा आराखडा तयार करणे म्हणजे ‘व्यवस्थापन’.
व्यवस्थापन महत्त्व व गरज-वरील प्रसंगात काय घडले तर व्यवस्थापनाचा अभाव! व्यवस्थापन असते तर
कोणताही गोंधळ झाला नसता. म्हणजेच कोणतेही काम करताना व्यवस्थापन असेल तर काम सोपे होते! आपण जर
कोणतेही काम इतरांबरोबर करणार असू तर त्याबाबत आराखडा करावा लागतो. हा आराखडा अधिक काटेकोरपणे
करावा लागतो. कोणते काम कोणी करायचे, कसे करायचे हे प्रत्येकास समजावून सांगावे लागते. प्रत्येकजण काम नीट
करीत आहे की नाही यावर देखरेख करावी लागते. कामासाठी किती खर्च येईल याचा अंदाज बांधावा लागतो. या सर्व
गोष्टी नेमके पणाने पार पडल्या तर काम पूर्ण होते, यात एकाने जरी चूक के ल्यास काम नीटपणे पूर्ण होत नाही.
मग, तुमच्या घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले तरीसुद्धा त्याचे व्यवस्थापन करावे लागते. उदा. जेवायला
कोणते पदार्थ बनवायचे? त्यासाठी कोणते सामान लागेल? ते घरात आहे की विकत आणावे लागेल? पाहुण्यांचे स्वागत
कसे करावे? ही आपली घरातील अशा छोट्या-छोट्या कार्यक्रमात जर व्यवस्थापन असेल, तर शाळा, गाव, जिल्हा,
राज्य व देश अशा सर्वच ठिकाणी व्यवस्थापन किती महत्वाचे व गरजेचे असेल ! मग असे व्यवस्थापन कोठे-कोठे करता
येईल? तर तुमचा अभ्यास, व्यवस्थापन, वर्ग व्यवस्थापन, शाळा व्यवस्थापन इ. बाबतीत व्यवस्थापन नेहमी झाल्यास
काम व्यवस्थित पार पडते, कोणताही गोंधळ होत नाही.
सराव करू या :
प्र. 1) घरी पाहुण्यांना जेवायला बोलावले आहे. त्याचे व्यवस्थापन तुम्ही कसे कराल ? ते पुढे लिहा.
प्र. 2) तुमच्या घरी, परिसरात कोणकोणते कार्यक्रम व्यवस्थापन करून साजरे होतात ?
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र. 3) तुमच्या शाळेत वर्गप्रतिनिधी (मॉंनिटर) माध्यमातून वर्गात कोणती कामे होत असतात? त्याची यादी पूर्ण करा.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र. 4) पुढीलपैकी कोणत्या कार्यक्रमात व्यवस्थापन गरजेचे वाटते, योग्य ठिकाणी खूण करा.
1. लग्न
2. खाऊ खाणे
3. गावातील सप्ताह
4. अभ्यास व खेळ
प्र. 5) तुमच्या मागील वर्षातील शाळा बंद असताना तुम्ही अभ्यास व खेळाचे व्यवस्थापन कसे के ले,
वर्गशिक्षकांशी/पालक चर्चा करून तक्ता तयार करा.
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_312225306020
72473622918
कौटुंबिक/वैयक्तिक नियोजन
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292499502555136138856
कृ तिपत्रिका : 22
समजून घेऊया : जुन्या व आधुनिक वाहतूक व संदेशवहनाची साधने, व त्यांचे फायदे
संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण-22, वाहतूक व संदेशवहन
अध्ययन निष्पत्ती : भूतकाळातील आणि सध्याच्या वस्तू आणि कृ ती यामधील फरक सांगतात. (उदा. परिवहन, चलन,
घरे, साहित्य, साधने, कौशल्य इ.)
लक्षात घेऊया :
वाहतुकीची साधने (जुनी व आधुनिक)
वाहतूक म्हणजे काय आपल्याला माहीत आहे? एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणे किं वा प्रवास करणे
म्हणजे वाहतूक. मग ती वाहतूक वस्तूची असेल किं वा आपली! आता मुलांनो, चित्रातील साधनांचे निरीक्षण करा. ही
साधने कशाची आहेत? ती आपण वापरतो का? सर्वच साधने वापरतो का? ही साधने कोणत्या काळातील आहेत?
त्याबाबत शिक्षक मुलांशी चर्चा घडवून आणतील.
वरील चित्रातून तुम्हाला काय लक्षात येते, तर ही वाहतुकीची साधने असून, ती वेगवेगळया काळांत आपण
वाहतुकीसाठी आपण वापरली आहेत. यामध्ये जुनी आणि आधुनिक साधने येतात. मग बैलगाडी, घोडागाडी, पालखी /
डोली तर कधी माणूस व प्राणी यांचा वाहतुकीसाठी वापर पूर्वी होत असे हीच जुनी साधने ! तर आता आधुनिक काळात
वाहतुकीची अत्याधुनिक साधने निर्माण झाली. उदा. आगगाडी, विमान, जहाज, रॉके ट, मेट्रो इ.
तुम्ही ह्या चित्रांचे निरीक्षण के ले असता ही साधने आहेत संदेशवहनाची! हे लक्षात येते. तर विविध प्रकारची
माहिती मिळवणे किं वा माहिती पोहचविणे म्हणजे संदेशवहन ! काही शतकांपूर्वी कबुतराच्या पायात चिठ्ठी बांधून संदेश
पाठविले जायचे. नंतर निरोप्याला पाठवून संदेशवहन होत असे. त्यानंतर तार व टपालसेवा सुरु झाली. ही
संदेशवहनाची जुनी (पूर्वीची) साधने होत. अलीकडच्या काळात संदेशवहनासाठी जलद तंत्रांचा वापर होऊ लागला.
आणि तो सर्वच क्षेत्रांत होऊ लागला. रेडिओ, दूरदर्शन, इंटरनेट, मोबाईल, फोन, इ. यामध्ये वृत्तपत्रे, नियतकालिके ,
पुस्तके , दूरदर्शन, इंटरनेट ही सार्वजनिक संदेशवहनाची साधने आहेत.
वाहतूक व संदेशवहन साधनांचे महत्व -
पूर्वीच्या वाहतुकीच्या साधनांच्या तुलनेत आधुनिक साधने जास्त वेगवान आणि सुरक्षित आहेत. त्यामुळे
वेळेची व श्रमाची बचत होऊ लागली. प्रवास (वाहतूक) जलद होणे सुलभ झाले.
संदेशवहनाची पूर्वीची साधने त्यावेळी जरी महत्वाची वाटत होती, ती आता संथ वाटू लागली. कारण आताच्या
आधुनिक साधनांमुळे संदेशवहन कमी वेळेत व जलद (एका क्षणात) होऊ लागले. जगात कोठेही निरोप पोहचविणे
सुलभ झाले, ते आधुनिक संदेशवहनाने! त्यामुळे वाहतूक आणि संदेशवहन साधनांमध्ये काळानुरूप बदल होत गेले
आणि त्याचे महत्त्व दैनंदिन जीवनात वाढू न ती आपली गरज झाली हे महत्वाचे. परंतु वाहतुकीची अथवा संदेशवहनाची
साधने गरजेनुसार वापरण्यासाठी असतात. त्यांचा अतिवापर, आपल्यासह सर्व सजीवांसाठी व पर्यावरणासाठी
हानिकारकच !
सराव करू या :
---------------------------------------
---------------------------------------
---------------------------------------
---------------------------------------
क) इ.चौथी परिसर अभ्यास - १ मधील पृष्ठ - १३५ व १३६ वरील उतारा वाचा आणि प्रश्नांची उत्तरे लिहा.
उताऱ्यातील वाहतुकीची व संदेशवहनाची साधने वर्गीकरण करा.
वाहतुकीची साधने संदेशवहनाची साधने
प्र. 4) खाली दिलेल्या साधनांचा जलद ते संथ असा क्रम लावा.
बैलगाडी, मानव, मेट्रो, विमान, गाढव
-------------------------------------------------------------------------
अवकाळी पाऊस :
पाऊस पडण्याचा ठराविक काळ सोडू न इतर वेळीही पाऊस पडतो अशा पावसाला 'अवकाळी पाऊस'
म्हणतात. हिवाळ्यात अधूनमधून पावसाचा शिडकावा झाला तर पिकांसाठी तो फायद्याचा असतो. पण या काळात
पाऊस फार जोराचा झाला, तर शेतात पाणी साचते. आंब्याचा मोहोर पण या पावसामुळे गळू न किं वा कु जून जातो व
आंब्याचे उत्पन्न कमी होते.
पूर :
भूकं प :
जमिनीच्या पोटात खडकांमध्ये काही हालचाली होतात. त्यामुळे अचानक खडकांच्या थरांमध्ये तरंग निर्माण
होतात. काही सेकं द जमीन हादरते. त्याला भूकं प म्हणतात. त्यानंतर परत सारे शांत होते. ज्या भागात भूकं प होतो,
तिथली घरे हादरतात. घरातल्या वस्तू धडाधड पडतात. कच्ची आणि मोडकळीस आलेली घरे तर साफ कोसळतात.
त्यांचे ढिगारे होतात. त्या ढिगाऱ्याखाली अडकू न माणसे दगावतात. अनेक माणसे जखमी होतात. भूकं पाच्या कें द्राजवळ
नुकसान जास्त होते.
भूकं पामध्ये पाळीव जनावरांचाही मृत्यू ओढवतो किं वा ती जखमी होतात. भूकं प झाला तर घाबरु नये. भूकं प
काही सेकं द होतो. भूकं प होत असताना आपल्या अंगावर आसपासच्या जड वस्तू पडू शकतात. त्यामुळे माणसे दगावतात
किं वा जखमी होतात. म्हणून भूकं प होत आहे असे लक्षात येताच खाटेखाली किं वा टेबलखाली बसावे किं वा दाराच्या
चौकटीत उभे राहावे. भूकं प थांबल्यानंतर रांगेने बाहेर पडू न शाळेजवळ मैदानात किं वा मोकळ्या जागेत जमा व्हावे.
त्सुनामी :
ज्यावेळी भूकं पाचा उगम समुद्रात असतो,
त्या वेळी भूकं पामुळे समुद्रात खूप मोठया लाटा
निर्माण होतात. एक-एक लाट इमारतीइतकी उंच
असते. या लाटा प्रचंड वेगाने किनाऱ्यावर येऊन
धडकतात. या लाटांना त्सुनामी म्हणतात. किनाऱ्यावर
माणसांची वस्ती असली आणि तिथे त्सुनामी झाली
तर खूप मोठी वाताहत होते. या लाटेच्या तडाख्यात जी
माणसे किं वा प्राणी सापडतात, ते त्या लाटेसमोर
अगदीच हतबल असतात. लाटेच्या पाण्यात बुडू न
मरण्यापलीकडे ते दुसरे काहीही करु शकत नाहीत.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
अ) अवकाळी पावसामुळे शेतीचे काय आणि कसे नुकसान होते ते तुमच्या शब्दात लिहा.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र. 3) एका नैसर्गि क आपत्तीविषयी वर्तमानपत्रात आलेली बातमी मिळवा व थोडक्यात लिहा.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र. 4) पुढे नैसर्गि क आपत्ती आणि मानवनिर्मि त आपत्ती असे कोष्टक दिले आहे ते खालील यादीच्या मदतीने पूर्ण करा.
1) चक्रीवादळ 2) मोडकळीला आलेले घर कोसळणे 3) वीज कोसळू न त्यात मरणे 4) दोन आगगाडयांची टक्कर
होणे 5) पटांगणातले वाळवी लागलेले झाड पडू न त्याखाली खेळणारी मुले जखमी होणे 6) जोरदार बर्फ पडू न दैनंदिन
जीवन विस्कळीत होणे 7) स्वयंपाकाचा सिलिं डर फु टून आग लागणे 8) विमान उडताना बिघाड होऊन अपघात घडू न
येणे
1 1
2 2
3 3
4 4
नैसर्गि क आपत्ती
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?referrer=utm_
source%3Dmobile%26utm_campaign%3Dshare_content&contentId=do_3122195917189
038081251
पूर
https://diksha.gov.in/play/collection/do_312526581812248576240484?contentId=do_
313292500026179584138871
कृ तिपत्रिका : 24
समजून घेऊया : लोकसंख्या वाढ, जमिनीतील पाण्याची पातळी
संदर्भ : इयत्ता-चौथी, प्रकरण 24 ,आपण परिसर धोक्यात आणत आहोत का ?
अध्ययन निष्पत्ती : निरीक्षण /अनुभव / माहितीची विभिन्न प्रकारांनी नोंद ठेवतात आणि परिसरातील विविध
घटनांच्या आकृ तिबंधाचे अंदाज देण्यासाठी कारण व परिणाम यांच्यातील संबंध प्रस्थापित करतात. (लोकसंख्या वाढ व
त्याची कारणे, परिणाम)
लक्षात घेऊया :
लोकसंख्या वाढ
खाली दिलेल्या दोन्ही चित्रावरून असे लक्षात येते की, पूर्वीपेक्षा सध्याच्या काळात लोकसंख्या वाढ खूप
प्रमाणात झाली आहे.
1951 साली जनगणना झाली. त्या वेळी आपल्या देशाची 36 कोटी होती. 2011 साली जनगणना झाली. त्या
वेळी आपल्या देशाची लोकसंख्या 125 कोटी होती.
गेल्या 60 वर्षात आपल्या देशाची लोकसंख्या तिपटीने वाढली. अजूनही ती वाढत आहे. आपण ज्या वस्तू
परिसरातून गरजेपोटी घेतो, त्यांची मागणी अतोनात वाढली. त्याचे नुकसान खालीलप्रमाणे झाले.
1) खेडेगावांमध्ये रोजगार मिळेनासा झाला. रोजगारासाठी खेडेगावातील लोक शहराकडे जाऊ लागले.
2) शहरांमध्ये दाटीवाटी होऊ लागली लोकांना रहायला जागा मिळेना. शहराभोवती शेती होती. मोकळ्या जागा
होत्या. तिथे नवीन वसाहती आणि रस्ते बांधण्यासाठी तिथली झाडे तोडावी लागली.
3) शहरांमध्ये कामावर जाण्यासाठी खूप मोठी अंतरे पार करावी लागतात. म्हणून शहरातले लोक वाहने खरेदी करू
लागले. शहरांमध्ये ही वाहने धूर ओकत फिरू लागली. शहरातल्या हवेत हा धूर मिसळू लागला. त्याचा परिणाम म्हणून
शहरांमधील लोकांना श्वसनाचे विकार होऊ लागले.
4) लोकसंख्या वाढल्यामुळे कधीकधी शहरात सांडपाण्याची व्यवस्था कोलमडते. त्यामुळे भर वस्तीत पाणी साचते.
त्यात डास वाढतात. डासांमुळे हिवताप, डेंगी, हत्तीरोग, चिकनगुनिया या रोगाचा प्रसार होतो.
शहरातल्या वस्तीवर लोकसंख्यावाढीचा खूप वाईट परिणाम होतो.
जमिनीतील पाण्याची पातळी-
पाणी ही सर्व सजीवांची एक महत्त्वाची गरज आहे. हळू हळू लोकसंख्या वाढू लागली. पाऊस मात्र तेवढाच
पडतो. त्यामुळे पाणी अपुरे पडू लागले. पावसाचे बरेचसे पाणी वाहून जाते. ते उपयोगी पडावे म्हणून आपण धरणे बांधून
पाणी अडवू लागलो. काहीजण विहीरी खणण्याऐवजी कू पनलिका खोदू लागले. पाणी उपसण्यासाठी हातपंप वापरू
लागले. पंपांमध्ये सुधारणा झाली. डिझेल वापरून चालवता येईल अशा यांत्रिक पंपाचा शोध लागला. विजेवर
चालणार्या पंपाचाही शोध लागला. पूर्वी हे पाणी पारंपरिक पद्धतीने दिले जाई. पाणी उपसण्यासाठी रहाटगाडग्याचा
आणि मोटेचा वापर के ला जाई. आता शेतीला पाणी देण्यासाठी अनेक ठिकाणी डिझेल विजेचे पंप वापरतात. पूर्वी मोटा
जितके पाणी उपसत होत्या, हे यांत्रिक पंप त्यापेक्षा कितीतरी पट जास्त पाणी उपसतात. याचा परिणाम म्हणून
जमिनीत मुरलेल्या पाण्याचा साठा झपाट्याने संपत चालला आहे.
सराव करूया :
प्र. 1) पुढील माहिती मिळवा व त्यापुढील प्रश्नाचे उत्तर लिहा.
1991 साली भारत देश प्रश्न: माहिती मिळविलेल्या लोकसंख्येत तुम्हाला फरक दिसला
लोकसंख्या का? असेल तर त्यामागचे कारण लिहा.
प्र. 2) काय करावे बरे ?
मुंबई येथे राहणार्या तुमच्या भावाची जुनी गाडी आहे. ती सुरू के ली की गाडीमधून खूप धूर येत असतो . तर
त्याने काय के ले पाहिजे असे तुम्हाला वाटते ?
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र. 3) आपल्या जीवनात पाण्याला खूपच महत्त्व आहे आणि माणूस या पाण्याचा वापर खूप कामासाठी करत असतो,
तर त्यातील तुम्हाला वाटणारे महत्वाची कामाचे चित्र खालील दिलेल्या रिकाम्या जागेत काढा आणि छानरित्या रंगवा.
प्र. 4) लोकसंख्या वाढ आणि पाण्याची बचत लोकांनी करावी, यासाठी काही घोषवाक्ये तयार करा व लिहा.
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
प्र. 5) खालील चित्राचे निरीक्षण करून ते चित्र कसले आहे ? आणि तुम्हाला या चित्राबद्दल काय वाटते ते दिलेल्या
रिकाम्या जागेत लिहा.
------------------------------------------
------------------------------------------
------------------------------------------
------------------------------------------
------------------------------------------
------------------------------------------
प्र. 2) हवेत पाणी वायुरूपात असते हे दाखवण्यासाठी तुम्ही कोणती कृ ती कराल ? (2 गुण)
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
--------------------------------------------------------------------------------
ब) का ते लिहा. (2 गुण)
2) धान्यावर रेडा / बैल लावून फिरवले जाते, शेतातील या कामाला उफणणी म्हणतात.
--------------------------------------------------------------------------------
प्र. 5) दिशाचक्राच्या आकृ तीमधील रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा. (2 गुण)
* * *