Professional Documents
Culture Documents
शाकाहारवाद्यांची असत्ये आणि मांसाहाराचे सत्य
शाकाहारवाद्यांची असत्ये आणि मांसाहाराचे सत्य
इतरांनी काय करावं, कसं वागावं हे सांगण्याची माणसांना फार हौस असते. यात आपल्याला ज्याचा
चांगला अनभ
ु व आला आणि फायदा झाला ते इतरांना सांगावं असा सद्भाव मनात असल्याम ळ
ु े
वैयक्तिक पातळीवर काही सांगावं हे ठीकच म्हणायचं . पण ते सांगतानाही आपला अनभ
ु व
तर्क संगत होता का, जो फायदा झाला त्यातील कार्यकारण भावाची सत्यता खरीच आहे कां, हे मुद्दे
महत्त्वाचे असतातच. ते तपासून मगच ती माहिती इतरांना दे णे हा झाला ज्ञानप्रसार. सत्यता न
पडताळता एखाद्या गोष्टीचा श्रध्दात्मक आग्रह धरून सांगत रहाणे म्हणजे अंधश्रध्दे चाच प्रसार.
धार्मिक-अध्यात्मिक कल्पनांच्या विश्वात असे अनेकदा चालतेच. प्रश्न येतो जेव्हा रोजचे आवश्यक
व्यवहार, निसर्गाचे व्यवहार या क्षेत्रात असल्या अंधविश्वासांतून स्फुरलेल्या कल्पना थयथयाट करू
लागतात तेव्हा. आज हा थयथयाट माणसाच्या आहाराबाबतही होऊ लागला आहे .
माणसाने काय खावे, कसे खावे, कां खावे याचा विचार मानवी नागर-अनागर संस्कृतींच्या प्रत्येक
टप्प्यावर होत गेला. जे उपलब्ध आहे , जसे हवामान आहे , जशी प्रकृती आहे त्यानस
ु ार विविध
प्रदे शांतल्या विविध लोकांनी आहाराच्या पध्दती ठरवल्या. अन्नग्रहणाचे सामाजिक, कौटुंबिक संकेत,
रीती ठरवल्या. आज जग जवळ आल्यानंतर एकमेकांच्या आहारपध्दतीही थोड्याबहु त स्वीकारल्या
गेल्या. अन्नघटकांत अनेक प्रकारची धान्ये , कडधान्ये, फळे मुळे, पानेफुले असा शाकाहार, मत्स्याहार,
मांसाहार, दही-दध
ू -लोणी-तूप-छे ना-चीक असा प्राणिज आहार अशा वैविध्यपूर्ण घटकांचा समावेश
होत गेला.
जगातील कुठल्याही धर्मात मांसाहार पूर्णपणे वर्ज्य करावा असे सांगण्यात आलेले नव्हते . प्रत्येक
धर्मात काही अन्नपदार्थ वर्ज्य आहे त. काही विशिष्ट काळासाठी काही आहार्य वस्तू वर्ज्य आहे त.
जैन धर्मात मात्र अशाक आहार पूर्णतः वर्ज्य मानण्यात आला आहे . आणि त्यातील कट्टरभाव
वाढत आहे .
हिंद ू धर्मात ब्राह्मण्याचे पावित्र्य जपण्याच्या काही निकषांमध्ये अशाक आहाराला अभक्ष्य
ठरवण्यात आले असले तरीही आधुनिक जगात पाऊल ठे वलेले जन्मजातीने ब्राह्मण असलेले
अनेक लोक हे निकष मानत नाहीत. मांस-मासे-अंडी अभक्ष्य मानत नाहीत.
ब्राह्मण्याचे निकष बदललेल्या जगात तर्क संगत विचार करून त्यानुसार आहार बदललेली तिसरी
पिढी तरी भारतात आहे च.
परं तु त्याचवेळ शाकाहारासंबंधी आग्रही प्रतिपादनाला आता एखाद्या आक्रमक धर्मपंथाची कळा
येऊ लागली आहे . जैन धर्मीय तर त्यात आहे तच, पण भारतीय परिघाबाहे र, जागतिक स्तरावरही
शाकाहाराचा प्रचार करणाऱ्या गटांनी अनेक अवास्तव मद्द
ु े उपस्थित केले आहे त. त्या मद्द्
ु यांचा
कठोर प्रतिवाद करण्याची गरज आहे . कारण या वादामळ
ु े मानवजातीचे विभाजन आणखी एका
अंगाने होऊ लागले आहे ., एवढे च नव्हे तर मानवी प्रगतीचा एकुणात अधिक्षेप करणाऱ्या एका
अविचारालाही या मंडळींच्या आक्रस्ताळे पणामुळे जोर येतो. जगातील अनेक माणसे, लहान मुले
एका श्रेष्ठ प्रथिनयुक्त आहाराला मुकतात, आरोग्य समस्यांच्या विळख्यात नाहक अडकतात.
फार खोलात जाऊन विचार न करणाऱ्या लोकांची दिशाभूल बाबा, बुवा फेथहीलर्स कशा प्रकारे
विज्ञानाच्या परिभाषेचा दरु
ु पयोग करून करतात हे तर सहजच पाहायला मिळते. हा सारा खेळ
प्रसिध्दी आणि पैशाचा असतो. यांच्या जोडीला इतरही अनेकांचे पडाव पडले आहे . ज्यांनाज्यांना
आपले काही विशिष्ट दक
ु ान चालवायचे आहे , प्रस्थापित सत्यांना विरोध दर्शवन
ू आपले ठाणे
प्रस्थापित करायचे आहे अशा जगभरातील विविध गटांत कोणकोण आहे त? यात आहे त पथ्ृ वीच्या
रक्षणाचे काही ठे केदार, प्राणिप्रेमाचे ठे केदार, पर्यायी आरोग्य नीती, पर्यायी विकासनीती, रिव्हर्स
एंजिनिअरिंगची भाषा बोलणारे आधुनिक महं त- अशा अनेकांची मांदियाळी त्यात पाहायला मिळते.
या सर्वांचीच दक
ु ाने भोळसट बहुसंख्येमुळे आणि या बहुसंख्येच्या बहुत्वाला भिऊन असलेल्या
सत्तेच्या दक
ु ानदारांमुळे तशी तेजीत चालतात. सर्वांचेच ध्येय पैसा असते असेही नाही. कुणाला
प्रसिध्दीचे वलय हवे असते, कुणाला काटे री मुकुट... जसे ध्येय तसा मोबदला बरोबर मिळतो. पैसा
हवा असेल त्यांना फंड्स आणि काटे री मुकुटाच्या प्रेमात असलेल्यांना पारितोषिके. कधीकधीतरी
दोन्हीही मिळतात. सभा-संमेलने, प्रकाशने, बिझनेस कम ्-प्लेज्झर-ज्यादा अशा परिषदा हे एक पैसा
मिळवण्याचे शूचिर्भूत साधन या गटांना चांगलेच अवगत झाले आहे .
माणसाची शरीररचना मांसाहार करण्यासाठी योग्य नाही, माणसाची पचनसंस्था, दातांची रचना हे
मांसाहाराच्या दृष्टीने निर्माण झालेले नाही हा त्यांचा सर्वात लाडका युक्तीवाद. शरीररचनेचा
वैज्ञानिक विचार केल्याचे वरकरणी दर्शवून चालवलेले हे एक चकचकीत खोटे नाणे आहे .
शरीरशास्त्राची वैज्ञानिक माहिती असलेला कोणताही तज्ज्ञ असे विधान करणार नाही. तर्क निष्ठा
गहाण पाडणाऱ्या एखाद्या प्रणालीच्या पगड्याखाली असलेली माणसेच असली विधाने करतात.
अनिमल लिबरे शन फ्रंट नावाच्या एका दक
ु ानाचे घोषवाक्यच आहे की ‘वी आर नॉट बॉर्न टु ईट
मीट’. आपण मांस खाण्यासाठी जन्मलेलो नाही. बऱ्याच शाकाहारवादी माणसांचे म्हणणे असते की
मांस हे आपले स्वाभाविक, निसर्गसंमत अन्नच नाही.
निसर्गसंमत म्हणजे काय? मानवाला इतर जीवांपेक्षा वेगळी बुध्दी निसर्गतःच मिळाली. एकाच
खाद्य वस्तव
ू र विविध संस्कार करून ती खाण्यायोग्य करण्याची बध्
ु दी माणसाकडेच आहे . आणि
त्या निसर्गदत्त बुध्दीचाच वापर करून मानवजात तगून राहिली. जे काही दात, दाढा, सुळे निसर्गतः
मिळाल्या त्यांचे आताचे स्वरूप हे त्यांच्या वापरामुळे उत्क्रांत होत आले आहे . माणस
ू आपल्या
भंवतालातील प्रत्येक निसर्गदत्त सजीव वस्तूमध्ये परिवर्तन-संस्कार करून ती खाऊ, पचवू शकतो.
उष्ण कटिबंधातील मामसे अनेक शाक-अशाक वस्तू जल, अग्नी, शस्त्रसंस्कार, विविध रसांचा-
तिखट, खारट, आंबट, गोड, प्रसंगी कडू, तरु ट चवींचा वापर करून खातात. मांस, मांसे, अंडी
वगैरेंप्रमाणेच धान्ये कडधान्ये , भाज्या, फळे मळ
ु े . फुले खातानाही त्यांवर काही संस्कार करूनच खावे
लागते. निवडणे, सोलणे, धुणे, बिजवणे, चिरणे, कुटणे, शिजवणे, तळणे, भाजणे हे संस्कार या सर्व
शाक-अशाक द्रव्यांवर करावेच लागतात. शीत कटिबंधांतील माणसं कमी-जास्त प्रमाणात तेच
संस्कार करतात. अतीशीत प्रदे शांतील एस्किमो आदि जमातींतील माणसे बर्फाळ हवेशी टक्कर दे त
जगताना कच्चे मांस, कच्ची चरबीही खाऊन त्यातून निर्माण होणारी ऊर्जा वापरतात.
दस
ु रे असे की माणसाची आतडी साधारण शध्
ु द शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा कमी लांब
असतात. पूर्णपणे मांसाहारी प्राण्यांच्या आतड्यांपेक्षा थोडी अधिक लांब असतात. पूर्ण शाकाहारी
प्राण्यांच्या शरीरात असतात तशी तीन-चार जठरांची रचना माणसांत नसते. रवंथ करण्यासाठी
योग्य अशी रचनाही माणसाच्या अन्नपचनसंस्थेत नसते. माणस
ू हा शाका तसेच मांस असे दोन्ही
प्रकारांतले अन्न घेऊ शकतो., ( तरीही “चार जठरं ” ही रचना सर्वच शाकाहारी प्राण्याना असतेच
असं नाही. पण इतर अवयव तत्सदृश कार्यासाठी वापरले जातात. उदाहरणार्थ अपेंडिक्स – काही
शाकाहारी प्राण्यांमध्ये वनस्पतीज सेल्युलोजच्या पचनासाठी लांब अपेंडिक्स असतात, ज्यात
जीवाणूंद्वारे सेल्युलोजचे पचन होते. मानवांमध्ये फक्त मोठ्या आतड्यात हे कार्य काही प्रमाणात
होते.)
दातांच्या उत्क्रांतीवर एक नजर टाकल्यास लक्षात येईल की मानवाची दं तरचना स ुद्धा शाक-अशाक
दोन्ही प्रकारच्या अन्नासाठी उपयक्
ु त आहे . शिवाय भाषा/धर्म इत्यादीच्या कल्पना पर्ण
ू त्वास
जाण्याआधी सद्ध
ु ा मनष्ु यप्राणी शिकारी आणि अन्न गोळा करणारा होता – ह्यामध्ये मांसासाठी
शिकार करणे एआणि वनस्पतिज अन्न ‘गोळा’ करणे हे च अध्याहृत आहे .
अशाक आहार घेणे किंवा मांसाहार करणे याचा अर्थ कुणीही शध्
ु द अशाक आहार घेत नाही.
शाकायुक्त आहारातच प्राणिज पदार्थांची किंवा पशुपक्ष्यांचे मांस, जलचर, उभयचर यांचे मांस यांची
ं री यांच्या जोडीला मांसाहार
जोड दिलेली असते. भात, भाकरी, पोळी, पाव, भाज्या, उसळी, कोशिबि
घेतला जातो. छान मजेत पचवतो माणूस सगळं . दातांनी, सुळ्यांनी तोडतो, किंबहुना सुळे हे मांस
तोडून काढण्यासाठीच उत्क्रांत झाले आहे त! आपल्या मानवेतर पर्व
ू जांमध्ये सळ
ु े बऱ्याचदा मोठाले
होते असे दिसन
ू आले आहे . तर माणस
ू अन्न चावतो, दाढांखाली रगडतो आणि त्याचं जठर, आतडी
आणि इतर सहाय्यक इंद्रिये आपापले पचवण्याचे काम यथास्थित करीत असतात.
संस्कृतींच्या यग
ु प्रवासात पाककला प्रगत झाली याला कारण होती माणसाची निसर्गदत्त बध्
ु दी,
निसर्गदत्त शरीररचना-म्हणजे पचनसंस्था आणि काय आवडतंय, काय नावडतंय हे कळवणारी
रसना. शरीराला काय अहिताचं आहे हे कळवण्यासाठी आजारी पडणारं शरीर आणि त्यापासून बोध
घेऊन आहारात बदल करण्यास सुचवणारी अक्कल हे सारं निसर्गदत्तच होतं. मग ते निसर्गसंमत
नसण्याचा प्रश्नच कुठे येतो.
दस
ु रा मद्द
ु ा पढ
ु े केला जातो तो क्रौर्याचा. तर्क निष्ठे ला, अनभ
ु वसिध्द ज्ञानाला खंट
ु ीला टांगन
ू केवळ
आपलीच भावना श्रेष्ठ मानणारांनी अशाक आहार घेणारांना क्रूर ठरवून स्वतःच्या माथ्यावर
संवेदनशीलतेचा किरिट ठोकून बसवला तरीही असले खळ
ु चट मत मनावर घेण्याची गरज नाही.
अशाक आहार म्हणजे जीवहत्या, मांसाहार म्हणजे क्रौर्य असे मानण्याच्या भ्रामक समजुतीवर या
भावनांचा डोलारा आधारित आहे . शाका म्हणजे सजीव नाहीत असे मानणे हे मध्ययुगातील
अडाणी माणसाचे मत असू शकते.
खरे तर धान्य खाणे म्हणजे भ्रूणहत्याच. जीवनशक्ती निद्रिस्त असलेल्या भ्रूणासारख्या बिया दोन
दगडांत भरडल्या दळल्या जातात, उकळत्या पाण्यात रटरटताना, गरम कढईत पडताना त्यांच्या
वेदनां ध्वनी उमटत नाही म्हणून त्यांना वेदनाच होत नाहीत असे गह
ृ ीत धरणे सोयिस्कर पडते
एवढे च. ऊब मिळते आहे , पाण्याचा ओलावा जाणवतो आहे अशा जाणीवेने गहू , कडधान्ये अंकुरायला
लागतात, वाढण्याचे स्वप्न त्या बीजांना पडू लागते. त्यांची जीजिविषा अशी जागवून त्यांना
फोडणीत परतून खाणे ही क्रूर जीवहत्या नाही? कोवळी रोपे उपटून त्यांची पाने चिरणे, फळ जून
झालेले नसताना अगदी कोवळे च पाहून चिरणे ही काय क्रूरता नाही? या सर्व निर्विवादपणे
जीवहत्याच आहे त. आणि शुध्द शाकाहारी म्हणवून घेणाऱ्या माणसांना त्या करणं भाग आहे .
कारण अजन
ू ही माणस
ू दगडमातीसारखे निर्जीव पदार्थ, रसायने, धातू खाऊन जिवंत रहाण्याइतका
प्रगत झालेला नाही. भावनांचेच भांडवल करायचे तर मग या जीवहत्यांचाही विचार जरूर करावा
(आणि मग प्रायोपवेशन-संथारा वगैरे करून आत्महनन करून मोकळे व्हावे. मोक्षच. कसे?)
निसर्गचक्र चालताना त्यात ज्या प्रमाणात साहचर्य आहे , तितक्याच प्रमाणात क्रौर्यही आहे . अर्थात
साहचर्य, क्रौर्य ही विशेषणे माणसाने दिलेली आहे त. खरे तर तो एक अटळ असा सष्ृ टीक्रम आहे .
प्रत्येक जीव त्याच्यात्याच्या गुणसूत्रांनुसार, जनुकांनुसार जगतो. त्यात नैतिकतेच्या तत्वांचा प्रश्न
नसतो. जगणे हीच एक नैतिकता असते. अन्नाच्या बाबतीत माणस
ू ही याच नैतिकतेचे तत्व पाळत
आला आहे .
स्वग्रहसंवर्धनाच्या नव्या जाणीवांमुळे आपण जीववैविध्य नष्ट होऊ नये म्हणून खाद्य जीव,
अखाद्य जीव असा फरक करू लागलो आहोत. यात पशप
ु क्ष्यांच्या जोडीने वनस्पतीही येऊ
शकतात. मांसाहार प्रिय असलेल्या व्यक्ती दर्मि
ु ळ झालेल्या जीवांची शिकार करून खातात असेही
नाही. असला आततायीपणा करणाऱ्या व्यक्तींचे वर्गीकरण शाकाहारी किंवा मांसाहारी असे न होता
निर्बुध्द, लोभी, लालची एवढे च करता येईल. शाकाहारी तसेच मांसाहारी असलेल्या अनेक व्यक्ती
दर्मि
ु ळ जीवसष्ृ टीच्या अवयवांच्या काळ्या बाजारात तसेच अनेक काळ्या व्यवहारांतही असतात.
तेव्हा काहीच फरक होत नाही. त्याच बरोबर आस्थेने आपला परिसर, आपली सष्ृ टी, आपला समाज
निरोगी रहावा म्हणून तळमळीने काम करणारांत शाकाहारी नि मांसाहारी दोन्ही आवडीनिवडींची
माणसे असतात. सुष्टत्वाचे आणि दष्ु टत्वाचे नमुने कोण काय आहार घेतो यावरही अवलंबून
नसतात. शाकाहार म्हणजे सात्विक आहार आणि मांसाहार म्हणजे तामसी आहार असा एक
लोकप्रिय गैरसमज आहे . ही आयुर्वेदिक संकल्पना आहे आणि ती आधुनिक विज्ञानाच्या कसोटीस
उतरत नाही.
वनस्पतींची जीवहत्या सात्विक आणि प्राणीजीवहत्या तामसी हा एक लटका भेद नाहकच करून
ठे वला आहे .
पशुपक्ष्यांची हत्या झाल्यानंतर त्यांचा जीवनरस म्हणजे रक्त आपल्याच रक्ताच्या रं गाचे
मेरीलॅ ण्ड विद्यापीठातील पेडिएट्रिक्स, मेडिसीन आणि फिझिऑलजीचे प्राध्यापक डॉ. अॅलिसिओ
फॅसॅनो आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केलेले संशोधन सायंटिफिक अमेरिकनच्या ऑगस्ट २००९च्या
अंकामध्ये प्रसिध्द झाले आहे . शेतीची कला अवगत झाल्यानंतर माणसाचा फळे , मुळे, पशुपक्ष्यांचे
मांस हा प्राथमिक आहार बदलला. हे अन्न शोधण्यासाठी करावी लागणारी भटकंती थांबली. एका
ठिकाणी राहून निश्चिंतपणे अन्न मिळवण्याचे शेतीतंत्र अवगत होताच धान्यबियांचे आहारातील
प्रमाण वाढले. त्यानंतरच माणसाला गहू, बार्ली, राय या धान्यांतील ग्लुटेन या प्रथिनामुळे त्यापूर्वी
होत नसलेले आतड्याचे विकार होऊ लागले असे त्यांचे निरीक्षण आहे . आतड्यांच्या विकारांनी
जगातील खूप मोठी लोकसंख्या त्रस्त आहे . ग्लुटेनयुक्त आहार कमी करावा असे सुचवताना
ग्लट
ु े नच्या दष्ु परिणामांवर उत्तर शोधण्यासाठी त्यांचे पढ
ु ील संशोधन सरू
ु आहे . ही सारी
शाकाहारात मोडणारीच धान्ये असन
ू ही त्यांचे दष्ु परिणाम आहे त, म्हणन
ू काही कुणी गहू खायचं
सोडून दे णार नाही. शिजवण्याच्या सर्वोत्तम पध्दती कोणत्या ते शोधायच्या कामाला माणूस
लागेल. त्यातील दोष कसे कमी करावेत ते शोधण्यासाठी अनेकांची बुध्दी कामाला लागेल.
माणसाने विकसित केलेल्या किंवा वापरात आणलेल्या अनेक आहारद्रव्यांमध्ये , अन्नसंस्कारं मध्ये
दोषकर आणि दोषशामक असे विशेष असतातच. आयुर्वेदाने तर अनेक प्रकारच्या मांसांचे, भाज्यांचे,
धान्ये, फळे -मुळे यांचे व्यक्तिशः गुणावगुणवर्णन केले आहे . पथ्यकर काय, कुपथ्यकर काय याचा
तपशीलवार अभ्यास करून निरीक्षणे नोंदवून ठे वली आहे त. त्याबद्दल लोकांना माहिती दे ण्याऐवजी
एकांगी प्रचार करण्याने कुणाचे कल्याण साध्य होते? काहीजणांची स्वतःबद्दलची श्रेष्ठत्वाची भावना
गोंजारली जाण्यापलिकडे यातून काहीही साध्य होत नाही.
शाकाहारी लोक अधिक निरोगी रहातात या दाव्याची शहानिश कुणी केली आहे कां ?
निरोगीपणाच्या कारणांचा अभ्यास करायचा तर त्यात आहाराव्यतिरिक्त कित्येक मुद्दे लक्षात
घेऊन संशोधन करावे लागेल. त्यात जीवशैली, आहार-विहार, दे शस्थान, हवामान, जलस्रोत, व्यसने
किंवा त्यांचा अभाव, अन्नाचा दर्जा, अभाव, वैपल्
ु य असे कितीतरी मद्द
ु े- वेरिएबल्स असतील.
मांसाहार केल्याने आरोग्यास बाध येतो असे सुचवले जाते. आधीच म्हटल्याप्रमाणे, मांसाहारी लोक
काही शध्
ु द मांसाहारी नसतात. शाकाहाराला ते मांसाहाराची जोड दे तात. मांसामधन
ू जी आठ
अमायनो आम्ले मिळतात, जीवनसत्वे मिळतात, लोह, जस्त, कॅल्शियम ही द्रव्ये मिळतात ती सारी
आरोग्याला मारक आहे त असा एक गैर निष्कर्ष यातून काढला जातो. इथे बऱ्याच लोकांचा गोंधळ
होतो. पार्श्वभूमी अशी : आपल्या शरीरातली प्रथिने एकूण २३ अमायनो अम्लांची बनलेली असतात.
त्यापैकी काही अशी आहे त की आपला शरीर इतर अमायनो आम्लांपास न
ू तयार करू शकतं . पण
दहा आम्ले अशी आहे त की ती शरीर तयार करू शकत नाही – ती आहारात न
ू च घ्यावी लागतात.
त्यांना essential amino acids म्हणतात. ह्यातली बहुतेक मांसाहारातून सहज उपलब्ध असतात. ही
ती आठ acids असावीत. जर हीच अभिप्रेत असतील, तर ती आरोग्याला हानिकारक आहे त हा
समाज निर्बुद्धपणाचाच नाही, तर धोकादायक आहे ! Essential amino acids ही शाकाहारातून सुद्धा
मिळू शकतात, नाही असं मळ
ु ीच नाही.
आपल्या शरीराला रोज (सरासरी) विविध amino acids वेगवेगळ्या मात्रेमध्ये आवश्यक असतात.
कुठलाही अन्नपदार्थ हे सगळी अचूक प्रमाणात दे ऊ शकत नाही. म्हणूनच आहारात वैविध्य असणे
आवश्यक आहे . ह्यामध्ये शाकाहार-मांसाहार संतुलन आणि दै नदि
ं न वैविध्य दोन्ही अंतर्भूत आहे त.
शध्
ु द शाकाहारामळ
ु े आरोग्यप्राप्ती होते हे अनभ्यस्त, असत्य विधान प्रचारकी थाटाला शोभेसे आहे .
आरोग्यशास्त्र आणि पोषणमूल्यांचा अभ्यास करणाऱ्या अधिकांश तज्ज्ञांनी या प्रचाराला आक्षेप
घेतला आहे .
आजकाल धर्माधिष्ठित शाकाहार प्रचाराला फॅशनचीही साथ मिळाली आहे . फॅशनचे हे तू थोडे
परस्परविरोधी वाटावेत असे दहु े री असतात. एक म्हणजे चारचौघात वेगळे पणाने उठून दिसण्याची
गरज वाटून फॅशन सुरू होते आणि मग एक नवा ट्रे न्ड आपणही स्वीकारला आहे , आपण काही
मागासलेले नाही हे दाखवण्याची गरज वाटून फॅशन रुळते. अनेक प्रश्नांवर लोक चालू फॅशनच्या
चौकटीत बसणारी मते चटकन ् स्वीकारतात. असल्या फॅशनकेंद्री मनमानी मतांचा पराभव करणे
सोपे नसते. कारण केवळ बुध्दीनिष्ठा ग्राह्य धरून सत्य आणि सत्यच स्वीकारण्याचे धैर्य
दाखवणारे नेहमीच अल्पमतात असतात.
शाकाहारवादी प्रचारक असे सांगतात की बी१२ हे जीवनसत्व शाकाहारी आहारात ून मिळू शकते.
काही शैवाले, सोयाबीन्स आंबवन
ू मिळणारे टें पी, यीस्ट नावाचे कवक यातन
ू बी१२ हे जीवनसत्व
लाभते हा त्यांचा दावा पूर्णपणे खोटा आहे . हे जीवनसत्व जरी त्या वनस्पतींमध्ये असले तरीही
त्या गोष्टी आपण खाल्ल्यानंतर आपल्या शरीराला उपलब्ध होत नाहीत, हे मात्र सांगितले जात
नाही- किंवा ते त्यांनाच माहीत नसावे. स्पिरुलिना, टें पी वगैरेंना आहारात समाविष्ट करून वैद्यकीय
चाचण्या घेण्यात आल्या आहे त. आणि त्यात ते घटक परिणामकारक ठरत नसल्याचे सिध्द झाले
आहे . यीस्टमध्ये तर नैसर्गिक स्वरुपातील बी१२ नसतेच . ते केवळ बाहे रील घटकांबरोबर संयोग
पावल्यानंतरच तयार होते. मांसाहाराला पर्याय म्हणून सुचवण्यात आलेल्या सोयाबीनची तिसरीच
कथा आहे . सोयाबीनची उत्पादने करणाऱ्या कंपन्यांच्या जाहिराती काहीही असोल, सोयाबीन हे काही
फारसे श्रेष्ठ धान्य नाही. त्यातील प्रथिनघटक पचवण्यास सोपे नाहीत. शिवाय सोयाबीनच्या
सेवनामळ
ु े विशिष्ट वयोगटातील स्त्रियांना थायरॉइड ग्रंथींचे विकार सरू
ु होतात हे सिध्द झालेले
आहे .
काही प्रचारक तज्ज्ञ सांगतात आतड्यांतील बॅक्टे रियाच बी१२ तयार करतात. तसे तर आहे च पण
तेथे तयार झालेले बी१२ शरीराला नीटसे लाभत नाही त्याचे काय... बी१२ मिळवण्यासाठी ते
जठरातील पचनप्रक्रियेत यावे लागते. दे शाच्या काही प्रदे शातील शाकाहारी लोकांमध्ये बी१२
जीवनसत्वाची कमतरता आढळून येत नाही म्हणून कदाचित ् असा निष्कर्ष काढला गेला. पण याच
प्रदे शात कीटकनाशकांचा वापर केला जात नाही. त्यामुळे तेथील शाकाहारात कीटकांची सक्ष्
ू म अंडी
असू शकतात, ज्यातन
ू त्यांची प्रथिनांची गरज काही प्रमाणांत भागत असावी, कीटक आणि त्यांची
अंडी ही भविष्यातील प्रथिनांचा पुरवठा असू शकतात अशा एका वैज्ञानिक निष्कर्षाची आठवण इथे
स्वाभाविकपणे होते. शरीराला सहजपणे शोषून घेता येईळ असे बी१२ जीवनसत्व केवळ प्राणिज
पदार्थांतूनच मिळू शकते हे सत्य आहे . लिवर, अंडी यातून ती सर्वात जास्त मिळतात. दग्ु धजन्य
पदार्थांतून थोड्या कमी प्रमाणात मिळतात. काही शाकाहारी लोक दध
ू आणि अंडीही आहारातून
वगळतात. अंडी खाल्ल्यामळ
ु े कोलेस्टे रॉल वाढते याचाही जो अवाजवी बाऊ करून ठे वला आहे
त्यामुळे अनेकजण अंडीही खात नाहीत. परिणामी बी१२ची कमतरता आणि त्यातून पुढे
अॅनिमिया जडणे ठरलेलेच.
आजकाल आधनि
ु क वैद्यकामळ
ु े बी१२च्या परू क गोळ्या उपलब्ध आहे त म्हणन
ू ठीक, न पेक्षा
हट्टाग्रही शाकाहारींच्या प्राणाशी गाठ होती. खरे म्हणजे बी१२च्या कमतरतेचा एकच मुद्दा
शाकाहाराच्या आरोग्यप्रदतेच्या मद्द्
ु याचा खात्मा करू शकतो. पण मुद्दे तरीही संपत नाहीत.
ओमेगा ३ आणि ओमेगा ६ ही फॅटी अॅसिड्स म्हणजे लिनोलिनिक आणि लिनोलेइक ही पॉली
अनसॅच्युरेटेड मेदाम्ले आहारातूनच आपल्याला मिळतात. शरीर स्वतः ती तयार करू शकत नाही.
ओमेगा३ अत्यल्प प्रमाणात पालेभाज्या आणि धान्ये यातून मिळत असले तरी प्रामुख्याने त्याचा
परु वठा मासे आणि अंडी यातन
ू च होतो. ओमेगा६ हे बव्हं शी भाज्यांमधन
ू मिळते आणि अल्प
प्रमाणात काही प्राण्यांच्या चरबीतन
ू मिळते. शाकाहारी लोकांची समजत
ू पटवण्यासाठी शाकाहाराचे
प्रचारक सांगतात की आपले शरीर ओमेगा ६पासून ओमेगा ३ गरज पडेल तसे रुपांतरित करू
शकते. असे होऊ शकत नाही असे मेरिलँ ड विद्यापीठाच्या संशोधक डॉ. मेरी एनिग यांनी सप्रयोग
सिध्द केले आहे . ओमेगा६ मेदाम्ले थोड्या वेगळ्या मेदाम्लांची निर्मिती करतात, तसेच ओमेगा
३चेही आहे . पण ओमेगा ६ चे ओमेगा ३ किंवा उलट होऊ शकत नाही. में दच
ू ी कार्यक्षमता आणि
रोगप्रतिकारक शक्ती चांगली रहावी म्हणून ओमेगा३ प्रकारातील मेदाम्ले अत्यावश्यक असतात.
भाज्यांतन
ू मिळणारी ओमेगा ६ प्रकारातील मेदाम्ले अत्याधिक प्रमाणात पोटात गेल्याने
नक
ु सानच होते. त्यांचे शरीरातील प्रमाण वाढल्यास ओमेगा३ वापरणे शरीराला कठीण होऊन बसते .
ओमेगा ३ कमी पडल्यास कर्क रोगाची शक्यता वाढते आणि एकंदरीत रोगप्रतिकारकशक्तीही
खालावते.
मेदाम्ले, बी१२ जीवनसत्व यांबाबत जशी अर्धसत्ये सांगितली जातात तशीच अ जीवनसत्वाबद्दलही
सांगितली जातात. अ जीवनसत्व हे शाकाहारातून भरपूर मिळते असा लोकप्रिय समज आहे .
प्रचारकांकडूनच तो अधोरे खित होत आला आहे . वनस्पतींमध्ये असलेल्या बिटा-कॅरोटिनचे रुपांतर
करून शरीर अ जीवनसत्व मिळवून शकते हे सत्य आहे . पण ते रुपांतर करण्यासाठी साथीला
चरबी किंवा तैलद्रव्ये खावी लागतात. शिवाय हे रुपांतर काही तेवढे से सोपे नाही. जे काही बिटा-
कॅरोटीन पोटात जाईल त्याच्या दोन टक्के अ जीवनसत्व शरीराला मिळते. शिवाय लहान मुले,
वध्
ृ द माणसे, थायरॉइड, गॉलब्लॅ डरच्या विकारांनी ग्रस्त लोकांना तितक्याही चांगल्या प्रमाणात हे
रुपांतर करता येत नाही. शरीराला सहज मिळे ल असे अ जीवनसत्व केवळ प्राणिज पदार्थांतून
मिळते. ताजे लोणी, तूप किंवा इतर प्राणिज चरबीयुक्त पदार्थांच्या सेवनानंतरच बिटा-कॅरोटिनपासून
अ जीवनसत्व मिळवता येते. अ जीवनसत्व आहारात पुरेशा प्रमाणात असेल तरच आहारात
आलेली प्रथिने किंवा खनिजद्रव्ये यांचा फायदा शरीराला घेता येतो.
मांसाहारी लोकांमध्ये हृदयविकार, मूत्रपिंडाचे विकार, कर्क रोग, स्थूलपणा, हाडांचा ठिसूळपणा अशा
सतरा रोगांचा प्रादर्भा
ु व अत्याधिक प्रमाणात असतो असे छातीठोकपणे सांगितले जाते.
मांसाहार त्याज्य आहे हे सिध्द करण्याच्या दृष्टीने अनेक अभ्यासप्रकल्प हाती घेतले गेले . हा
प्रकल्प शाकाहारवादाकडे झुकणाऱ्या शास्त्रज्ञांकडे असूनही त्यांच्या निरीक्षणांचे निष्कर्ष अपेक्षेच्या
उलट निघाले. डॉ. एच ्. ए. कान, डॉ. डी ए स्नोडेन यांच्या अभ्यासांतन
ू शाकाहारी लोकांना दीर्घायष्ु य
असल्याचा मुद्दा निकाली निघाला. अखेर वैज्ञानिक सत्याशी प्रतारणा करू न शकलेल्या या
शास्त्रज्ञांनी तसे मोकळे पणाने मान्य केले . पण तरीही शेवटी शक्य तो मांसाहार करू नये असेच
सांगून तर्क निष्ठे शी प्रतारणा केली.
शाकाहार घेणे महत्त्वाचे आहे च. आपण सारे च प्रायः शाकाहार घेतो. कर्बोदके मिळवण्यासाठी धान्ये ,
पचनसंस्था स्वच्छ ठे वण्यासाठी तंतुमय भाज्या यांना पर्याय नाहीच. परं तु तेवढ्याने पुरत नाही
हे ही मान्य करावे लागते.
प्राचीन मानव प्रामुख्याने शाकाहारी होते हा दावा तर फारच फसवा आहे . आदिमानवांच्या आहारात
फळे मळ
ु े होती असे आग्रहाने सांगितले जाते. त्यांच्या आहारात अगदी कमी चरबीचे मांस थोडेफार
होते, पण तो मुख्यत्वे शाकाहारीच होता म्हणून तो इतका निरोगी होता असे सांगितले जाते. हे
दावे मनगढन्त म्हणावेत इतक्या कमी माहितीच्या आधारावर आधारित आहे त. अजूनही शिल्लक
असलेल्या ठिकठिकाणच्या आदिम जमातींचे निरीक्षण केले तरीही त्यातील तथ्यांशाचा अभाव
समजतो. काही ठिकाणी शिकारीचे मांस मिळे नासे झाले, पाळीव प्राण्यांचे मांस परवडेनासे झाले ...
एकूणच अन्न न परवडल्यामळ
ु े त्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे . प्राण्यांची प्रचंड प्रमाणात
शिकार झाल्यामुळे काही प्राणी नामशेष झालेले असताना प्राचीन मानव शाकाहारी होता असे
म्हणणे हास्यास्पद आहे .
स्वतःची जी काही खाद्यसंस्कृती आहे किंवा तत्वे आहे त ती आपल्यापुरती जपावीत. ती इतर
लोकांवर काय आपल्या अजाण मल
ु ांवरही लादण्याचा प्रयत्न करू नये . शाकाहारी जैन धर्मीय
स्वतंत्र गह
ृ संस्था करून रहाण्याचा प्रयत्न करतात तोवर ठीक आहे . पण मिश्र गहृ संस्थांत जागा
घेऊन ते इतरांना हाकलून काढू पाहातात तेव्हा तो दरु ाचार ठरतो. आपल्या पर्युषणपर्वात इतरांनीही
शाकाहार करावा- म्हणजे केवळ वनस्पतीजीवांची हत्या करावी- म्हणून मासळीबाजार, कत्तलखाने
बंद ठे वण्याचा आग्रह धरणे हाही दरु ाचारच.
आरोग्यरक्षणासाठी मितभक
ु ् , हितभक
ु ् आणि अशाकभक
ु ् रहावे असा आयर्वे
ु दानेच उपदे श दिला आहे
हे भारतीय संस्कृती मूळ शाकाहारी आहे असा खोटा दावा करणाऱ्या भुक्कड लोकांनी लक्षात
घ्यावे.
मितभुक् म्हणजे आहार कमी असावा. खादाडपणा करू नये . भुकेपेक्षा दोन घास कमी खावेत.
खाण्याच्या दोन वेळांतही किती कालांतर असावे तेही आयुर्वेदाने सांगितले आहे . दोन तासांच्या
आत पन्
ु हा खाऊ नये आणि सहातासांपेक्षा जास्त काळ न खाता राहू नये . आधुनिक वैद्यकाने,
पोषणाहारशास्त्रानेही हाच सल्ला दिला आहे .
आणि या लेखासाठी सुसंदर्भित म्हणजे- अशाकभुक्- आहारात अशाक म्हणजे प्राणिज, प्राणिजन्य
पदार्थ असावेत. फार जास्त प्रमाणात शाका खाऊ नयेत.
शाकाहार म्हणजे काहीतरी नैतिक आचरण आहे असे म्हणणे , शाकाहार हा पोषणाच्या दृष्टीने
सर्वश्रेष्ठ आहार आहे असे सांगणे हा सत्यापलाप आहे . आणि सत्यापलाप हा सर्वात मोठा दरु ाचार
आहे .
मुग्धा कर्णिक