Professional Documents
Culture Documents
ईशावास्य उपनिषद १
ईशावास्य उपनिषद १
होय. आधीचे ३९ अध्याय हे कर्मकांडाविषयी आहेत आणि हा शेवटचा अध्याय मात्र ईश तत्वाविषयी आहे.
संहितेचा भाग असलेले हे एकमेव उपनिषद आहे. ईश उपनिषदा मध्ये फक्त १८ मंत्र आहेत, पण या १८
मंत्रात जगण्या विषयी मार्गदर्शन आणि परिपूर्ण तत्व विचार दोन्ही आहे. अस म्हणतात की या लहानश्या
उपनिषदात वेदांचे सार आहे, गीतेचे बीज आहे. याची सुरवात ‘ईशावास्यमिदं सर्वम् ‘ अशी होते म्हणून
या उपनिषदाचा शांतिमंत्र :
हा माझा खूप आवडता शांतिमंत्र आहे. ते जे दूर आहे, माझ्या दृष्टीपलीकडचे आहे ते परिपूर्ण
आहे. हे जे माझ्या जवळ आहे, जे माझे जग आहे ते पूर्ण आहे. त्या पूर्णातूनच हे पूर्ण व्यक्त झाले आहे. जे
अथांग आहे, परिपूर्ण आहे त्यातून पूर्ण काढू न घेतले तरीही पूर्णच शेष राहते. गणितात इन्फिनिटी ची
कल्पना हीच तर आहे. इन्फिनिटी मधून काहीही काढू न घेतले तरीही इन्फिनिटी च शिल्लक राहते.
या जगात कर्मे करता करताच शंभर वर्षे जगण्याची इच्छा के ली पाहिजे. याहून दुसरा कर्मबंधनातून मुक्त
होण्याचा मार्ग नाही. या प्रकारे कर्म के ल्यास तुला कर्म बंधनकारक होत नाही. असा याचा अर्थ.
पण आपले कर्म कोणते हे कसे कळावे? असा प्रश्न मनात आला आणि नेमका आजच तुकारामांचा एक
अभंग वाचला, तो असा आहे:
क्रमशः