Professional Documents
Culture Documents
Katha by VSB
Katha by VSB
भोजन
पाट,पाण्याचे लोटी भांडे ,ताट , वाटी (चमचा गरज असेल तर) , हातांनीच जेवायचे.
पानात काहीही टाकायचे नाही.आवड नावड नाही . पहिल वाढलेले सगळे खायचे.नको असेल तर
परत घ्यायच नाही. हा दंडक होता.ही शिस्त होती.नावडते पदार्थ पाण्याच्या घोटाबरोबर गिळायचे पण
पानात काही टाकायचे नाही. जेवणाला नावे ठेवायची नाहीत.पदार्थ कसाही झाला तरी
खायचा.माऊली कष्टाने रांधुन , प्रेमाने सगळ्यांना जेवायला वाढतेय.साक्षात अन्नपूर्णा आहे
लाही
ती.क लाही शा च्या
नांव ठेवायची नाहीत.पूर्वी स्टोव्ह वर,चूली वर,कोळयाच्या श्या
शेगडीवर स्वयंपाक करायचा.
कधीतरी पदार्थाला धुराचा किंवा रॉकेलचा, करपलेला वास यायचा. पण न बोलता जेवायचे. खूप कडक
शिस्त होती.नसते लाड चालायचेच नाहीत.अन्नाला नांवे ठेवायची नाहीत.
शाळेतही श्लोक म्हणूनच डबा खायचा.एकमेकांना वाटावाटी करुन खायचा.समजा कोणी आणला नसेल तर
त्याचही पोट भरायचे.हे संस्कार न कळत घडत होते.
पणानेशी
नका मागू काही अधा पणाने
आई नेहमी म्हणायची खाऊन माजावे पण टाकून माजू नये.अन्नाचा शाप बाधतो. अर्थ फारसा
कळायचा नाही.पण पानात वाट्टेल ते झाले तरी टाकायचे नाही हा संस्कार सहज घडला.अन्नाचा
कणही वाया जाता कामा नये असा सक्त नियम होता.
साठी
क साठी शा
हे अन्न मी सेवणार
.
उदरभरण आहे चित्त होण्या वि ललशा
नको तिथे लाड नाहीत.वेळच्या वेळी सांगायचे .त्यामुळे चांगली शिस्त, संस्कार मनात
रुजतात.सगळ्या भाज्या, पदार्थ आवडीने खाल्ले जातात .पानात पडेल ते खायचे.टाकायचे नाही.
हवे तेवढेच घ्यायचे .दोन घास कमी पोटात गेल्याने काही बिघडत नाही.हे विचार मिळतात.
तेव्हा लग्नाच्या पंगतीतही वदनी कवळ घेता हा श्लोक खणखणीत आवाजात म्हटंला जात असे.
पार्वतीपते हर हर महादेव. च्या गजराने भोजनास प्रारंभ होत असे. लहान मुलांनाही पंगतीत
वा
बसून हवं नको विचारुन वाढले जात असे.पान स्वच्छ केल्या!वाययशि
उठता येत नसे.
लहान असताना बोडणाला कुमारिका म्हणून जेवायला एकटेच जावे लागे. बोलावणे आल्यावर नाही
म्हणत नसत.
बदल करायचा कालानुरूप पण शाश्वत जीवन मूल्य सोडायची नाहीत तोच आपल्या समृद्ध जीवनाचा पाया
आहे. त्यातला भाव , मर्म समजून घ्यायचे