चतुर्थ वर्ष आयुर्वेदाचार्य परिचय • कटिभागी (Lumbo-sacral region) तैलाच्या सहाय्याने स्वेद देण्याची क्रिया कटिबस्ति होय. • पंचकर्मातील अतिशय लोकप्रिय स्वेदनाची क्रिया. • वसती वासन म्हणजे काही काळ 'वास' (Retain) करणे या अर्थाने 'बस्ति' हा शब्द प्रयोग के ला गेला असावा. • हा स्निग्ध प्रकाराचा स्वेद आहे. कटिबस्ति साठी योग्य व्याधी
2. सहचरादि तैल - कफानुबंध 3. धान्वन्तरम् तैल 4. बला तैल - वातज 5. प्रसारणी तैल 6. क्षीरबला तैल - Degenerative disease (1) द्रोणी -1 (2) उडीद पीठ - 500 gm (3) आवश्यक तैल - 200 - 300 ml संभार संग्रह (4) पातेले (5) चमचा • पूर्वकर्म : (1) पाळी तयार करणे - I. सर्व प्रथम उडीदाचे पीठ चाळणीने गाळून आवश्यकतेनुसार त्यात पाणी घालावे व मळून घ्यावे. II. त्यानंतर थोडं उडीदाच्या पीठाची पिष्टी बाजूला ठेवून उरलेल्या सर्व पीठाची गोलाकार रिंगण / पाळी (Rim) तयार करावी. III. याचा आकार रुग्णांच्या कटिवर सुखकर बसेल असा असावा. (2) रुग्ण सिध्दता – IV. रुग्णास मल-मूत्र विसर्जनानंतर नितंबभागापर्यंत निर्वस्त्र करून द्रोणीमध्ये पालथे झोपण्यास सांगावे. V. वरील तयार के लेली पाळी रुग्णाच्या कटिभागावर ठेवून त्यास उरलेल्या उडीदाच्या पिष्टीने त्वचा व पाळी यातील पोकळी बंद करून घ्यावी ज्यामुळे पाळीतील तैल बाहेर पडणार नाही. (3) तैल कोष्ण करणे – एका मोठ्या पातेल्यामध्ये गरम पाणी घ्यावे, त्यामध्ये एका लहान पात्रात तैल घेवून कोष्ण करण्यास ठेवावे. तैलाचे सामान्यता तापमान 45 ते 50° C एवढे असावे. • प्रधानकर्म : 1. सहाय्यकाने पाळीमध्ये आपले बोट घालून त्यावर चमच्याने कोष्ण तैल हळूहळू सोडावे. रुग्णास सहन होईल असे तैलाचे तापमान असावे याची काळजी घ्यावी. 2. दरम्यानच्या काळात सहाय्यकाने तैलामध्ये अंगठा हळुहळू फिरवावा व रुग्णाच्या कटिभागी अल्पदाबाने मर्दन करावे. यामुळे तैलाचे तापमान एक सारखे राहील व स्थानिक मर्दनाने रूजा शांत होईल. 3. ही क्रिया होत असतांना तैलाचे तापमान कमी झाल्यास चमच्याच्या सहाय्याने तैल बाहेर काढावे व पुन्हा नवीन कोष्ण तैल पाळीमध्ये घालावे. हा क्रम चालू ठेवावा. तैल बदलण्याच्या काळात वेळ जाऊ देऊ नये. सुमारे अर्ध्या तासानंतर तैल बाहेर काढू न पाळी देखील काढू न घ्यावी. 4. दर 3 दिवसानंतर नवीन तैल घ्यावे पिझिचिल प्रमाणे 7 व्या दिवशी तिसऱ्या दिवसाचा व सहाव्या दिवसाचे उरलेले तैल घ्यावे. • सामान्य तापमान 45 ते 50° C • कालावधी - 30 - 45 मिनिटे, 7 ते 14 दिवस • पश्चातकर्म : 1. अभ्यंग - पाळी काढू न घेतल्यानंतर कटिभागी लागलेल्या तैलाच्या सहाय्याने हलक्या दाबाने अभ्यंग करावे. 2. स्वेदन - अभ्यंगानंतर टॉवेल गरम पाण्यातून पिळून त्याद्वारे कटिप्रदेशी स्वेद करावे. 3. स्नान - स्वेदनानंतर 15 मिनिटे रुग्णास उताणा (supine ) अवस्थेत झोपण्यास सांगावे व नंतर - हरभरा डाळीचे पीठ कटिप्रदेशी लावून कोष्ण जलाने स्नान करण्यास सांगावे. • घ्यावयाची काळजी - 1. क्रिया करतांना रुग्णास पालथ्या स्थितीमुळे शूल वाढल्यास तात्काळ क्रिया थांबवावी. 2. तैल बदलण्याचा काळ अधिक नसावा. 3. तैलाचे तापमान रुग्णास सुखकर असावे.
• उपद्रव व चिकित्सा - दग्ध - घृतकु मारी, शतधौत घृत - स्थानिक धन्यवाद !!! ....